पाकिस्तानने कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर - रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:27 PM2019-08-17T13:27:05+5:302019-08-17T13:49:08+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.

Ravi Shankar Prasad responds positively if Pakistan takes action | पाकिस्तानने कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर - रविशंकर प्रसाद

पाकिस्तानने कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर - रविशंकर प्रसाद

Next
ठळक मुद्देराज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अ.भा. संमेलनास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य नेत्यांच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देणार नाही, पण पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ असे प्रतिपादन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. भारत स्वत:ची सुरक्षा करण्यास पूर्णपणे सक्षम आहे असे सांगून आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय काश्मिरी जनतेच्या भल्यासाठी घेण्यात आला आहे. यात देशाचेही हित आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात झाली. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होत आहेत. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे.
वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित या संमेलनाचे शनिवारी सकाळी केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
रविवारी दुपारी १२.१५ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्य विधी सेवा प्राधिकरणे आणि उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करणे, समाजातील गरजू व्यक्तींना नि:शुल्क व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणे, कारागृहात विधी सेवा, गुन्हे पीडितांना भरपाई, पयार्यी वाद निवारण यंत्रणा इत्यादी मुद्यांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील.

Web Title: Ravi Shankar Prasad responds positively if Pakistan takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार