शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई : डी. मल्लिकार्जुन रेड्डी

By कमलेश वानखेडे | Updated: October 18, 2024 17:47 IST

Nagpur : डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा थेट फडणवीस- बावनकुळेंवर आरोप

कमलेश वानखेडे- नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या निवडणुकीत रामटेकमधून आपण भाजपा अधिकृत उमेदवार असताना आ. आशीष जयस्वाल हे बंडखोरी करीत अपक्ष लढले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला माझ्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्या विरोधात आपरण उठवला असता मला पक्षातून निलंबित करण्यात आले. मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समर्थक असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली, असा थेट आरोप पक्षातून निलंबित करण्यात आलेले भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकाजून रेड्डी यांनी केला.

डी. मल्लिकार्जून रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढविला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कुणालाही न कळवता परस्पर आशीष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. जयस्वाल यांच्या बंडखोरीमुळे माझा पराव झाला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी मी कशी सहन करणार. जयस्वाल यांच्या उमेदवारीविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेउन सुमारे ५०० जणांनी राजीनामा दिला. माझे म्हणणे समजून न घेता, मला कुठलिही कारणे दाखवा नोटीस न देता फडणविस- बावनकुळे यांच्याकडून ताबडतोब करवाई करण्यात आली. मी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून पक्षाचे काम करीत आहे. गडकरी साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कारवाई केली जात आहे. आज माझ्यावर करवाई झाली, उद्या दुसऱ्यावर होईल. मी याबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना पत्र पाठविले आहे. मी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला नको, असे बोललो म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली माझ्यावर करवाई झाली. हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे, असेही ते म्हणाले.

मी पराभूत झाल्यावर देखिल भाजपचे काम करीत आहे. तीन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीचे सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे मला उमेदवारी द्यायची नसेल तर भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी आपली मागणी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये आमची लढत थेट जयस्वाल यांच्या सोबत असते. त्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही का मान्य करावी, असा सवालही रेड्डी यांनी केला.

गडकरी- फडणवीसांमध्ये मतभेदभाजप नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. मात्र ते मला उघडपणे बोलता येणार नाही. हा विषय फार मोठा आहे. माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार अनिल सोले हे आता सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. तेसुद्धा गडकरी यांचे समर्थक आहेत, असे सांगत रेड्डी यांनी पक्षांतर्गत मोठी धुसफूस सुरू असल्याचा दावा केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMallikarjun Reddyमल्लिकार्जुन रेड्डीnagpurनागपूर