Join us

दर बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद

By admin | Updated: May 12, 2014 22:57 IST

उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून १५ जून पर्यंत होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे.

ठाणे - उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून १५ जून पर्यंत होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत ठाणे शहर पाचपाखाडी, चरई, नौपाडा, सिध्देश्वर, उथळसर, महागिरी, वृदांवन, श्रीरंग, ऋुतुपार्क, कळवा, खारेगांव, रेतीबंदर व मुंब्य्रातील काही भागांचा पाणीपुरवठा १४ मे २०१४ पासून प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार असून, नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पाणीपुरवठा विभागा केले आहे.