Join us  

मुंबई ते बाली थेट विमानसेवेला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:25 AM

गरुडा इंडोनेशिया विमानसेवेच्या ए-३३० प्रकारातील विमानाद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे.

मुंबई : इंडोनेशियामधील बाली येथे जाण्यासाठी मुंबईहून थेट विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे. सोमवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस ही विमानसेवा सुरू राहील. गरुडा इंडोनेशिया विमानसेवेच्या ए-३३० प्रकारातील विमानाद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. या विमानाची आसन क्षमता २२२ प्रवासी इतकी आहे. हे विमान रात्री ८.२५ ला मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येईल व ९.५० ला बालीसाठी रवाना होईल. सोमवारी होणाऱ्या पहिल्या उड्डाणासाठी गरुडा इंडोनेशियाचे वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार आहेत. बाली हे पर्यटनस्थळ असल्याने तेथे जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याचा लाभ मुंबईसह देशातील पर्यटकांना मिळेल.

टॅग्स :पर्यटन