Join us  

पाणी मागितल्याच्या रागात गतिमंद मुलाची हत्या

By admin | Published: May 27, 2017 3:03 AM

पाणी मागितल्याचा राग येऊन एकाच कुटुंबातील चौघांनी एका गतिमंद मुलाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाणी मागितल्याचा राग येऊन एकाच कुटुंबातील चौघांनी एका गतिमंद मुलाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चारकोपमध्ये घडली. गुरुवारी उशिरा रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी चौघांना अटक केली.संजय गंगातिवरे असे मृत मुलाचे नाव आहे. संजय हा कुटुंबीयांसह चारकोपच्या भादरानगरमध्ये राहत होता. चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री संजय याच परिसरात राहणाऱ्या मोहिते कुटुंबाच्या घरी जाऊन पाणी मागू लागला. तेव्हा त्या कुटुंबीयांनी त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो न गेल्याने त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संजयला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. ही माहिती चारकोप पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून सुनील मोहिते, तेजस्विनी मोहिते, कलावती मोहिते आणि अजित मोहिते या चौघांना अटक केली. विशाल मोहिते आणि विजय गायकवाड हे दोघे सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.मोहिते आणि गंगातिवरे कुटुंबीय आधीपासून एकमेकांना ओळखतात. या कुटुंबांमध्ये यापूर्वीही किरकोळ कारणांवरून भांडणे व्हायची. त्याच रागातून त्यांनी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.