Join us  

स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:08 AM

तारांकित शहराचे निकष पूर्ण करण्याचे लक्ष्य : १४ डिसेंबरपर्यंत सूचना, आक्षेप कळविण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेने ...

तारांकित शहराचे निकष पूर्ण करण्याचे लक्ष्य : १४ डिसेंबरपर्यंत सूचना, आक्षेप कळविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेने गेल्या वर्षी स्वच्छतेसाठी पायाभूत सुविधा, माहिती-शिक्षण-संवाद अंतर्गत उपक्रम, क्षमता बांधणी असे काम केले आहे. परिणामी घरोघरी कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांतर्फे कचऱ्याची जागेवर विल्हेवाट, प्लास्टिकबंदी, कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट असे बदल दिसून आले. परिणामी आता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महापालिका आटापिटा करत आहे.

मुंबई महापालिकेने कचरामुक्त तारांकित शहरमध्ये मुंबईला पंचतारांकित (५ स्टार) साठी नागरिकांचे आक्षेप व अभिप्राय मागविले आहेत. १४ डिसेंबर किंवा त्यापूर्वी हे कळविण्यात यावे, असे आवाहन केले आहे. स्वच्छतेची चांगली पातळी गाठण्यासाठी केंद्राने कचरामुक्‍त तारांकित शहरचे निकष ठरविले आहेत. शहरांना प्रगतीशील सुधारणांसह स्वच्छतेच्या ७ स्टारचे ध्येय गाठता येईल, अशा प्रकारे हे निकष आहेत. दरम्यान, हागणदारीमुक्‍त मुंबईसाठी नागरिकांनी आक्षेप अथवा सूचना असल्‍यास त्‍यांनी १४ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी कळवाव्‍यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शौचालयाची योग्‍य ती स्थिती आणि‍ देखभाल ठेवून हागणदारीमुक्‍तचे ध्‍येय गाठता येईल, अशा प्रकारचे हे निकष आहेत.