'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:40 AM2022-05-17T11:40:50+5:302022-05-17T11:41:52+5:30

मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

MNS Navi Mumbai leader Gajanan Kale has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena | 'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

Next

मुंबई-  एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. 

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?, असा सवाल उपस्थित करत जमीनदोस्त करा हे थडगं... म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. तसेच माननीय बाळासाहेब ठाकरेही हेच म्हणाले होते, बाळासाहेबांचे काहीच ऐकायचे नाही आहे का?, नाही तरी औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहेच, असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला आहे.

खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच  एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं. 

दरम्यान, बीकेसीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपासह एमआयएमवर देखील निशाणा साधला. औरंगाबादमध्ये ओवेसींच्या झालेल्या सभेचा उल्लेख करताना भाजपाच्या ए.बी.सी. टीमा पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोकं टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो. आमच्या संभाजीनगरमध्ये असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर टिका आणि तुम्ही गेले तेव्हा काय? असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.  

'...त्यांनी इथे येऊन राजकारण करु नये'- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आता सदर प्रकरणाचा निषेध केला आहे. एखादा राजकारणी बाहेरून येऊन औरंगजेबच्या समाधीला जातो या गोष्टीचा मी निषेध करतो, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज्यात कुठेतरी जातीपातीचे राजकारण होत असून त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही त्याने इथे येऊन राजकारण करू नये, अशा शब्दात शरद पवारांनी ओवेसींना ठणकावले आहे. 

Web Title: MNS Navi Mumbai leader Gajanan Kale has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.