Vidhan Sabha 2019 : वरळी मतदारसंघाला काय हवं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 02:01 AM2019-09-19T02:01:44+5:302019-09-19T02:02:32+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - Worli Constituency Review | Vidhan Sabha 2019 : वरळी मतदारसंघाला काय हवं ?

Vidhan Sabha 2019 : वरळी मतदारसंघाला काय हवं ?

Next

आमदाराचे नाव : सुनील शिंदे, शिवसेना
मतदारसंघ : वरळी

>बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला सुरुवात झाली असून वरळीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
>हे घडलंय...
वाचनालयांचे नूतनीकरण पूर्ण
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याने प्रकल्प सुरु
सिद्धीविनायक मंदिरातील हंगामी कर्मचाऱ्यांचा शासकीय
सेवेत समावेश
जलवाहिनीचे नूतनीकरण पूर्ण
उद्यान नूतनीकरण पूर्ण
>हे बिघडलंय...
वरळी किल्ल्याचे नूतनीकरण रखडले
वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या
बीडीडी पुनर्विकासाची कासवगती
रस्ता रुंदीकरणात अडथळा
>वरळी मतदारसंघ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघ हा सध्या राजकारणातील केंद्रबिंदू झाला आहे. २००९ ची निवडणुक सोडली असता या मतदार संघात सेनेचे वर्चस्व राहिले आहे. यंदा या मतदार संघातून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील तरुण नेतृत्त्व असलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघाची लढत अधिक रंगतदार होणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मतदार संघात जोरदार मोर्चबांधणी सुरु असून येत्या काळात येथील राजकीय हालचालींना वेग मिळेल.
>पाच वर्षांत काय केलं?
वरळी मतदार संघात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न महत्त्वाचा होता. या प्रकल्पाला नुकतीच मान्यता मिळाली आहे, असून पुनर्विकासाचा श्रीगणेशा झाल्याने मतदारांमध्ये समाधानाची भावना आहे. तर दुसरीकडे वरळी येथील कामगार रुग्णालय सुसज्ज करण्यात आले. त्याचप्रमाणे, लादीकरण, जलवाहिनी नूतनीकरण आणि उद्यानांच्या सुभोभीकरण व नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
>विधिमंडळातील कामगिरी
प्रजा संस्थेच्या अहवालानुसार, वरळी मतदारसंघातील सुनील शिंदे यांच्या कारकीर्दीनुसार त्यांना पाचव्या स्थानावर प्रमाणित करण्यात आले आहे. त्यांच्या कारकीर्दीला संस्थेने ७९.३८ टक्के दिले असून त्यांचे कार्य चांगले असल्याचे अहवालात म्हटले आहे. शिंदे यांनी तिन्ही अधिवेशनात तब्बल ९४० प्रश्न विचारले असून सवार्धिक प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५३ प्रश्न शिंदे यांनी विचारले आहेत. तर हिवाळी अधिवेशनात ११६ प्रश्न विचारले आहेत.
>आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी सेनेत प्रवेश केल्याने आता या मतदार संघात सेनेला कोणताही अडसर उरलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुनिल राणे तर काँग्रेसकडून दत्ता नवघणे रिंगणात होते. नवघणे यांना जेमतेम पाच हजार मते मिळाली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचाही उमेदवार रिंगणात असेल. मात्र सेनेच्या मतांवर याचा फारसा परिणाम होताना दिसणार नाही.
>विधानसभा २०१४ निकाल
सुनील शिंदे, शिवसेना-
६०,६२५
सचिन अहिर, राष्ट्रवादी
३७,६१३
सुनील राणे, भाजप -
३०,८४९
दत्तात्रय नवघणे, काँग्रेस-
५,९४१
नोटा - १५५९
मतदानाची एकूण टक्केवारी
५५.९३ टक्के
> वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल असला तरी या प्रकल्पाचे काम अत्यंत कासवगतीने सुरु आहे. केवळ निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिखाव्याकरिता लोक प्रतिनिधींनी याचा घाट घातला आहे. शिवाय, कोस्टल रोडच्या प्रश्नावर स्थानिक प्रतिनिधी कोणतीही ठाम भूमिका घेत नाही, हे चुकीचे आहे.
- दत्ता कायंदे, स्थानिक रहिवासी
>TOP वचनं
वरळी किल्ला नूतनीकरण
पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार
आरोग्य केंद्र दर्जा सुधारणा
शाळांची दुरुस्ती करणार
शौचालयांची दुरुस्ती
ज्येष्ठ नागरिकांना
विशेष सेवा

 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - Worli Constituency Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.