Maharashtra Government: राज ठाकरेंच्या एकमेव शिलेदाराने बहुमताच्या चाचणीत घेतली ''ही'' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 05:22 PM2019-11-30T17:22:46+5:302019-11-30T17:36:21+5:30

सरकारवरील विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते.

Maharashtra Government: 169 MLAs voted in favor of the government. | Maharashtra Government: राज ठाकरेंच्या एकमेव शिलेदाराने बहुमताच्या चाचणीत घेतली ''ही'' भूमिका

Maharashtra Government: राज ठाकरेंच्या एकमेव शिलेदाराने बहुमताच्या चाचणीत घेतली ''ही'' भूमिका

Next

मुंबई: सरकारवरील विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीने बहुमत ठराव जिंकला. 169 आमदारांचा सरकारच्या बाजूने मतदान केले. भाजपाने सुप्रीम कोर्टाचे आदेश, नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मतदान झाले. तसेच मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तटस्थ राहण्याच्या आमदारांमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा देखील समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला त्यांचे बंधू व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या निमित्ताने तरी ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याचप्रमाणे विधानसभेत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सरकारवरील विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. या बहुमताच्या चाचणीत मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर मंत्र्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतली. पहिल्यांदाच हंगामी अध्यक्ष बदलण्याचा नियमबाह्य काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत विधानसभा अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सुप्रीम कोर्टाचे आदेश व  नियमांची पायमल्ली होत असलेल्या सभागृहात आम्ही बसणार नसल्याचे सांगत भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता.

अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ केला व त्यानंतर भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला.  

Web Title: Maharashtra Government: 169 MLAs voted in favor of the government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.