बेघरांना घर घर : मुंबईला हवीत १२५ निवारा गृहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 03:32 PM2020-09-06T15:32:47+5:302020-09-06T15:34:29+5:30

१ लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक निवारागृह असणे गरजेचे आहे.

Homeless for the homeless: Mumbai needs 125 shelters | बेघरांना घर घर : मुंबईला हवीत १२५ निवारा गृहे

बेघरांना घर घर : मुंबईला हवीत १२५ निवारा गृहे

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात ०.३१ मिलियन लोक बेघर आहेत.०.२३ मिलियन बेघर लोक हे निवारा गृहात राहताना दिसुन येतात.


मुंबई : शासनाच्या सर्वेनुसार मुंबईतील बेघरांची संख्या ही ५४ हजार ४१६ इतकी आहे. परंतु अभ्यासानुसार ही संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. हे बेघर लोक फूटपाथ, ब्रिजच्या खाली, मंदिराजवळ, स्टेशनवर, स्टेशनच्या बाहेर इतरत्र जागा मिळेल तिथे राहतात. शहरातील १ लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक निवारागृह असणे गरजेचे आहे. परंतु मुंबईतील निवारागृहांची संख्या ही तुलनेने फारच कमी आहे. परिणामी मुंबईत १२५ निवारा गृहे आवश्यक असून यावर प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे.

पोटाची खळगी भरत नाही म्हणून कुटुंबाची कुटुंबे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईत स्थलांतरीत होत आहेत. मिळालेच कुठे काम तर दिवसभर काबाडकष्ट करून जोडीला ६०० ते ६५० रुपये मिळतात. न्यायालयाच्या निर्णयानुसार या बेघर लोकांना निवारा मिळावा म्हणून निवरागृह निर्माण केली जावीत, अशी तरतूद आहे. परंतु तुटपुंजी निवरागृहे असल्याने या लोकांना असेच उघड्यावर राहावे लागत आहे. सध्या पावसाळ्यात गळणारी छपरे, अर्ध्या ओल्या झालेल्या चादरी अंगावर ओढताना असमाधानाचा चढलेला पारा त्यांचे जीवन असह्य करून टाकतो आहे.

परिणामी राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेच्या अंतर्गत बेघर लोकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला निवारागृहे चालविणे सक्तीचे आहे. २०१४ ते २०१९ महानगरपालिकेच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या निवारागृहांची आकडेवारी जर आपण पहिली तर ती केवळ ९ इतकी आहे. उर्वरित १० निवारागृहे ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालविली जात आहेत. मात्र तुलना केली तर याबाबतच्या सेवा अपू-या आहेत.
 

- २०१७ अहवालानुसार आतापर्यंत १,३३१ निवारागृहांना अनुमती दिली आहे.
- त्यातील फक्त ७८९ (५९%) निवारागृहे सध्या सुरु आहेत.
- एकूण बेघर लोकसंख्येच्या ४.५ % लोकसंख्येला निवारा आहे.
- आकडेवारीनुसार भारतात १६,९३९ निवारा गृहांची बेघरांसाठी आवश्यकता आहे.

 

पोटाची खळगी भरत नाही म्हणून कुटुंबाची कुटुंबे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईत स्थलांतरीत होत आहेत. मिळालेच कुठे काम तर दिवसभर काबाडकष्ट करून जोडीला ६०० ते ६५० रुपये मिळतात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या बेघर लोकांना निवारा मिळावा म्हणून प्रत्येक शहरात निवरागृह निर्माण केली जावीत, अशी तरतूद आहे. परंतु तुटपुंजी निवरागृहे असल्याने या लोकांना असेच उघड्यावर राहावे लागत आहे. सध्या पावसाळ्यात गळणारी छपरे, अर्ध्या ओल्या झालेल्या चादरी अंगावर ओढताना त्यांचा जगण्याचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो.  
- नामदेव गुलदगड, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, युवा संस्था
 

 

Web Title: Homeless for the homeless: Mumbai needs 125 shelters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.