मुंबई : अनुकंपा व वारसा हक्काने नोकरी आणि कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिवाचे काहीही बरे-वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारवर टाकत देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी १ सप्टेंबरला उपोषण आणि ७ सप्टेटंबरपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीने बेमुदत बंदची हाक दिली. त्याला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह कोतवालांनी पाठिंबा दिला. त्यानंतर समन्वय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेत देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर संघटनांची पदाधिकारी साखळी उपोषण करून त्यांना साथ देतील.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे उपोषण
By admin | Updated: August 31, 2015 01:54 IST