Join us

निवडणुकांनी पाणी अडवले!

By admin | Updated: October 10, 2014 03:14 IST

सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आहे़

मुंबई : सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आहे़ मुंबईकरांना पाणी पुरवणा-या जल अभियंत्या खात्यातील बहुसंख्य कर्मचारी-अभियंते निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्याचा फटका पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे़ या पाणीकपातीचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटत आहेत़ याची कबुली देत कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक बिघाड हेदेखील एक कारण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले़ कुर्ला येथील वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे़, अशी तक्रार स्थानिक नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांनी केली़ हा मुद्दा उचलून धरीत अशीच परिस्थिती चुनाभट्टी, अंधेरी पश्चिम, वरळी आणि मालाड या विभागात असल्याचे सर्वपक्षीय सदस्यांनी निदर्शनास आणले़ ऐन निवडणुकीच्या काळात पाण्याची समस्या सुरू असल्याने नगरसेवकांना रोषास सामोरे जावे लागत असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली़या विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठ्याबरोबरच गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची वेळी सतत बदलत आहे़ मालाड पूर्व येथील रहिवाशांनी तर दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याची तक्रार केली असल्याचे भाजपाचे सदस्य विनोद शेलार यांनी सांगितले़ यावर खुलासा करताना भातसा धरणातून होणाऱ्या पाणी वितरणामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ही समस्या सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास खरगे यांनी सांगितले़साहाय्यक आयुक्तही व्यस्तनिवडणुकीच्या कामात अभियंत्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते़ असे एकूण शंभर अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. पण या वेळेस साहाय्यक आयुक्तही निवडणुकीत व्यस्त असल्याने पाण्याच्या समस्यांची तक्रार कोणाकडे करायचे, अशी खंत विनोद शेलार यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)