Coronavirus: गेल्या महिन्यात घटली कोरोनाच्या मृत्यूंची संख्या; सक्रिय रुग्ण वाढताहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:01 AM2020-12-02T03:01:48+5:302020-12-02T03:01:58+5:30

धोका अद्याप कायम, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कमी झाले. राज्यात ऑक्टाेबर महिन्यात २ लाख ९३ हजार ९६० कोरोना रुग्ण आढळले

Coronavirus: The number of coronavirus deaths decreased last month; Active patients are on the rise | Coronavirus: गेल्या महिन्यात घटली कोरोनाच्या मृत्यूंची संख्या; सक्रिय रुग्ण वाढताहेत

Coronavirus: गेल्या महिन्यात घटली कोरोनाच्या मृत्यूंची संख्या; सक्रिय रुग्ण वाढताहेत

Next

मुंबई : राज्यात ऑक्टाेबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये काेरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूंमध्ये ५० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसते आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ८० हजारांवर आलेली एकूण सक्रिय रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने धोका वाढण्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कमी झाले. राज्यात ऑक्टाेबर महिन्यात २ लाख ९३ हजार ९६० कोरोना रुग्ण आढळले, तर नोव्हेंबरमध्ये १ लाख ४५ हजार ४९० रुग्णांची नोंद झाली. ऑक्टाेबरच्या तुलनेत हे प्रमाण ५०.५ टक्क्यांनी कमी झाले. ऑक्टाेबरमध्ये ७ हजार २४९ तर, नोव्हेंबर महिन्यात ३ हजार ६९० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृत्युदरही ४९.०९ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसते आहे. एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्हीचे प्रमाण आठ टक्के होते. नोव्हेंबरमध्ये ते प्रमाण ७.७ टक्क्यांवर आले आहे.

राज्यात कोरोना संसर्गाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे, २० नोव्हेंबर रोजी ७८ हजार २७२ एकूण सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. तर २१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ही संख्या ९० हजार ५५७ झाली. दहा दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये १५.६९ टक्के वाढ झाली.

चाचणी, निदान, उपचारांवर भर
राज्याच्या आरोग्य विभागाने यापूर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार, रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध, चाचणी, निदान आणि उपचार यावर शहर व ग्रामीण पातळीवर भर देण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.  

राज्यात ४ हजार ९३० रुग्णांचे निदान
मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ४ हजार ९३० रुग्णांचे निदान झाले असून ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार २४६ आहे. दिवसभरात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. - वृत्त/२

Web Title: Coronavirus: The number of coronavirus deaths decreased last month; Active patients are on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.