... म्हणून 'मुंबई 24 तास' संकल्पना मुंबईसाठी गरजेची आहे -  आदित्य ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 06:20 PM2020-02-22T18:20:18+5:302020-02-22T18:37:08+5:30

यावेळी आदित्य ठाकरे यांनी पर्यटन आणि पर्यावरण यावरही भाष्य केले.

the concept of 'Mumbai night life' is a necessity for Mumbai - Aaditya Thackeray | ... म्हणून 'मुंबई 24 तास' संकल्पना मुंबईसाठी गरजेची आहे -  आदित्य ठाकरे  

... म्हणून 'मुंबई 24 तास' संकल्पना मुंबईसाठी गरजेची आहे -  आदित्य ठाकरे  

googlenewsNext
ठळक मुद्दे'मुंबईकर रात्रभर नुसता गोंधळ घालणार नाहीत''मुंबई 24 तास संकल्पनेमुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल''मुंबईकरांवर विश्वास न ठेवणे हा मुंबईकरांवर अन्याय आहे'

मुंबई : 'मुंबई 24 तास' (नाईटलाईफ) ही  संकल्पना मुंबईसाठी का गरजेची आहे, याबाबत सविस्तर माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात दिली. मुंबईतील 'मुंबई 24 तास' ही खूप सोपी संकल्पना आहे. मुंबईत कामाचा काही वेळ नसतो. तसेच देशाच्या विविध भागातून लोक मुंबई पाहण्यासाठीही येत असतात. त्यांना रात्री-अपरात्री जेवणाची किंवा इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी मी नाईटलाईफची संकल्पना आणली आहे, असे एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबई 24 तास संकल्पनेमुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल. अनेकांना रात्रीची मुंबई अनुभवता येईल. वीकेंडला मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, थिएटर या सोई त्याठिकाणी उपलब्ध असाव्यात, म्हणून नाईट लाईफ गरजेची आहे." याशिवाय, जगभरातील इतर देशांमधील अनेक शहरे रात्रंदिवस जागी असतात. मग आपण मुंबईवरही विश्वास टाकला पाहिजे. मुंबईकर रात्रभर नुसता गोंधळ घालणार नाहीत. मुंबईकरांवर विश्वास न ठेवणे हा मुंबईकरांवर अन्याय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी पर्यटन आणि पर्यावरण यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "जी खाती कुणीही घेतली नाहीत, ती खाती मी मागून घेतली. या खात्यांमार्फत मला चांगले काम करण्याची इच्छा आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मला महाराष्ट्रातील पर्यटनाची क्षमता दिसली. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने खूप काही पाहण्यासारखे आहे. या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो." 

याचबरोबर, वातावरणातील बदलांमुळे मोठे आव्हान पर्यावरण खात्यासमोर आहे. पर्यावरण खात्यामार्फत प्रत्येक नागरिकामध्ये वातावरण बदलांबद्दल जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, डोंबिवली येथील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील उद्योगांना पर्यावरणासंबंधीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल. शिवाय, पर्यावरणाची कोणतीही हानी सहन केली जाणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, शरद पवारही उपस्थित

शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

संपूर्ण देशात एनआरसी लागू न करण्याचे मोदींनी आश्वासन दिले : उद्धव ठाकरे

Web Title: the concept of 'Mumbai night life' is a necessity for Mumbai - Aaditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.