अपघातातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक, वारसांना सरकारी मदत जाहीर

By महेश गलांडे | Published: February 15, 2021 03:48 PM2021-02-15T15:48:33+5:302021-02-15T15:50:24+5:30

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे

CM uddhav thackeray offers condolences to those killed in road mishap of jalgaon accident | अपघातातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक, वारसांना सरकारी मदत जाहीर

अपघातातील मृतांबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक, वारसांना सरकारी मदत जाहीर

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली.

जळगाव - तालुक्यातील अभोडा, केर्‍हाळे, विवरे, रावेर येथील हातावर पोट असलेले मजूर बायका पोरांसह धुळे जिल्ह्यातील शहादा तालूक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमीप्रमाणे जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एक दाम्पत्य, तीन कुटूंबातील मायलेकी व मायलेकांसह ११ जण अभोडा येथील, दोन रावेर तर केर्‍हाळे व विवरे येथील एकेक जण असे एकूण १५ जण पपईने भरलेला ट्रक किनगावनजीक पलटल्याने आज पहाटे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सर्वत्र हाहाकार उडवणाऱ्या या घटनेने अभोडा, विवरे, केर्‍हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची दखल घेत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली असून संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शहादा येथे  पपई भरून आणण्याच्या हातमजूरीसाठी गेलेल्या तालुक्यातील हे मजूर रविवारी ट्रकमध्ये पपई भरून रावेरला आणत असताना क्रूर नियतीने झडप घालून यावल तालुक्यातील किनगावजवळ बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने अभोडा येथील एकाच आप्तपरिवारातील ११ जणांवर झडप घातल्याने अभोडा गावावर शोककळा पसरली.

मृतांची नावे

मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय ४०), संगिता अशोक वाघ (वय २५) या दाम्पत्यासह त्यांची  लहानगा मुलगा सागर अशोक वाघ (वय ०३ वर्षे)व  नरेंद्र वामन वाघ (वय २५) हे एकाच परिवारातील चार सदस्य कमलाबाई रमेश मोरे (वय ४५) यांची शारदा रमेश मोरे (वय १५) व गणेश रमेश मोरे (वय ०५) वर्षे ही दोन्ही मुल मुली , संदीप युवराज भालेराव (वय २५) व दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) हे दाम्पत्य, सबनूर हूसेन तडवी (वय ५३) व दिलदार हुसेन तडवी (वय २०) हे मायलेकांसह  रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकीरवाडा रावेर, डिगंबर माधव सपकाळे वय ५५ रावेर, केर्‍हाळे येथील सर्फराज कासम तडवी वय ३२ व संदीप युवराज भालेराव विवरे अशी १५ जण जागीच ठार झाल्याने एकच शोककळा पसरली असून, अभोडावासीयांची साखरझोपेतील झोप उडाली असून मुखशुद्धीसह चहापाणीसाठी आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.

उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

Web Title: CM uddhav thackeray offers condolences to those killed in road mishap of jalgaon accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.