Join us  

‘चोटी गँग’ आता मुंबईतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:08 AM

उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

मुंबई : उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.भायखळा येथील मदनपुरा परिसरात फरिदा शेख (३९) मुलीसोबत राहतात. १२ आॅगस्ट रोजी मध्यरात्री २च्या सुमारास त्या घरात झोपल्या असताना अंगावरून काहीतरी सळसळत जात असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लाइट लावून पाहताच त्यांचे अर्धे केस कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी राहत असलेला अकबर हा भाऊ धावून आला. त्याने घराबाहेर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच नव्हते. या प्रकरणी अकबरने आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.अशीच एक घटना १५ आॅगस्टला घडली. आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरात रोशन खातुम (४०) राहतात. त्या घराबोहर झोपल्या होत्या. रात्री अडीचच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा हातात अर्धवट कापलेली वेणी आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकताच पती नदिम घराबाहेर आले. मात्र तिथे कोणीच नव्हते. या प्रकरणी त्यांनीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असाच एक प्रकार १६ आॅगस्टला वडाळ्यात घडला. अनिता शर्मा केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. त्या झोपून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे. या घटनांमुळे अफवांचे पीक आले आहे.>अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घडलेल्या घटनांचा सखोल सुरू असून लवकरच सत्य उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले.>अंधश्रद्धा किंवा विकृतीअंधश्रद्धा, किंवा विकृतीतून या घटना घडत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटना कितपत खºया आहेत याची शहानिशा सुरू आहे.