Join us  

छगन भुजबळ येणार तुरुंगाबाहेर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:16 AM

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे आनंदित झालेल्या त्यांच्या नाशकात पेढे वाटून जल्लोष केला.

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे आनंदित झालेल्या त्यांच्या नाशकात पेढे वाटून जल्लोष केला.५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर भुजबळांना जामीन मिळाला असला तरी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आर्थर रोड जेलमधून बाहेर येण्यास त्यांना सोमवारपर्र्यंत वाट बघावी लागेल.सुमारे १०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळ, मुलगा पंकज, पुतण्या समीर व अन्य १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने चौकशी पुढे नेत, भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटींंचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. ईडीने १० तास चौकशी करून, १४ मार्च २०१६ रोजी त्यांना अटक केली. ही अटक म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. हे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते करीत होते, तर भुजबळ जामिनासाठी प्रयत्न करत होते. प्रकृती खालावत असूनही त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला नव्हता.सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे दिलासामनी लाँड्रिंग कायद्याच्या कलम ४५ (१)खाली बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांना गुन्हा सिद्ध होईपर्र्यंत अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. मात्र ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी घटनाबाह्य ठरविली. कायद्यातील हा बदल भुजबळांना दिलासा देणारा ठरला.दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत. आपले वय ७१ वर्षे आहे. तब्येतही साथ देत नाही. त्यामुळे सहानुभूतिपूर्वक विचार करून आपला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती भुजबळांनी न्यायालयाला केली होती.या अटींवरमिळाला जामीनसाक्षीदारांवर दबाव न आणणे, स्थानिक पोलीस ठाण्यात पासपोर्ट जमा करणे, परदेशात जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घेणे आणि ईडीने चौकशीसाठी बोलाविल्यास हजर राहणे, या अटी न्या. प्रदीप देशमुख यांनी भुजबळ यांच्यावर घातल्या आहेत.जामीन हा भुजबळ यांचा हक्क होता. दुर्दैवाने त्याला उशीर झाला. ते लढवय्ये आहेत. संघर्ष करून पुन्हा उभे राहतील. आम्ही त्यांच्यामागे उभे आहोत.- अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेसजामीन यापूर्वीच मिळायला हवा होता. त्यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केले व यापुढेही करतील.- जयंत पाटील,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :छगन भुजबळबातम्या