Join us  

अवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:49 AM

शिवाजीनगर परिसरात बुधवारी अवघ्या १५ मिनिटांत एका २२ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येपाठोपाठ १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली

मुंबई : शिवाजीनगर परिसरात बुधवारी अवघ्या १५ मिनिटांत एका २२ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येपाठोपाठ १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. एकाच परिसरात घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.शिवाजीनगर येथील संजयनगर पोर्ट परिसरात १७ वर्षांचा सलमान रफिक सय्यद आईवडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहायचा. वर्षभरापूर्वी त्याने शिक्षण सोडून दिले होते. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान याच परिसरात निरंकारी कॉलनीत ११.४५च्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली. पूनम जयस्वाल (२२), असे विवाहित तरुणीचे नाव आहे. वर्षभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते. तिने आजाराला कंटाळून हे पाऊल उचलल्याची सुसाइड नोट पोलिसांना मिळाली आहे. आत्महत्येप्रकरणी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही यात नमूद करण्यात आले आहे.