Join us  

तलावांमध्ये ८५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 2:17 AM

पाण्यासाठी वणवण करणाºया मुंबईकरांसाठी यंदाच्या मान्सूनने सुखद दिलासा दिला आहे. मुसळधार पावसाने तलाव परिसरात मुक्काम ठोकला आहे.

मुंबई : पाण्यासाठी वणवण करणाºया मुंबईकरांसाठी यंदाच्या मान्सूनने सुखद दिलासा दिला आहे. मुसळधार पावसाने तलाव परिसरात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे दोनच पावसाळी महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये ८५ टक्के जलसाठा जमा झाला आहे. वर्षभरासाठी पाण्याची कटकट मिटण्याकरिता आणखी अडीच लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा होण्याची गरज आहे.सन २०१५मध्ये अपुºया पावसामुळे पाणीप्रश्न पेटला होता. गेल्या वर्षी मात्र तलावांमध्ये तुलनेत चांगला पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावांमधील जलसाठ्याची स्थिती उत्तम होती. त्यात मुसळधार सरी सतत तलाव परिसरात हजेरी लावत असल्याने पावसाळ्याच्या दीड महिन्यातच पाणीप्रश्न सुटला आहे. काही दिवसांतच सर्व धरणं भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये एकूण १२ लाख २१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. ८५ टक्के जलसाठा जुलै महिन्यातच जमा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा.मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलक्ष लीटर्स एवढी आहे.दररोज २५ ते ३०% म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये (मि.मी.)तलाव    कमाल     किमान     आजची स्थिती    मोडक सागर    १६३.१५    १४३. २६   १६३.१६        तानसा    १२८.६३    ११८.८७    १२८.५४            विहार    ८०.१२    ७३.९२      ७८.४४          तुळशी    १३९.१७    १३१.00       १३८.९६   अ. वैतरणा    ६०३.५१    ५९५.४४    ६०१.८०      भातसा    १४२.०७    १०४.९०    १३६.४९               मध्य वैतरणा    २८५.००    २२०.००    २८२.६५