Join us  

राज्यात १८ लाख ७७ हजार रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ३०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १८ लाख ...

मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ३०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के झाले असून मृत्युदर २.५४ टक्के असल्याची माहिती राज्याच्या आराेग्य विभागाने दिली. सध्या राज्यात ५२ हजार ५५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात गुरुवारी काेराेनाच्या ३ हजार ५७९ रुग्णांचे निदान झाले असून ७० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८१ हजार ६२३ झाली असून बळींचा आकडा ५० हजार २९१ झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३६ लाख २३ हजार २९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.५५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १ लाख ९६ हजार ८२९ व्यक्ती घरगुती तर, २ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

...........................