प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 01:53 PM2021-06-19T13:53:57+5:302021-06-19T13:55:23+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत.

After coming to the limelight, these actresses disappeared from the Marathi film industry. See who they are. | प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?

प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?

googlenewsNext

झगमगत्या या चंदेरी दुनियेत कित्येक जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या हाती लागते यश तर काहींच्या अपयश. अशाच मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. चला तर जाणून घेऊयात या अभिनेत्रींबद्दल...

कादंबरी कदमः

कादंबरी कदम एकेकाळी आघाडीची अभिनेत्री होती. तिने नाटक आणि मालिकेत काम केले. अवघाची संसार, तुझ्या विना सख्या रे या मालिकेतून ती घराघरात पोहचली. काही वर्षांपूर्वी तिने दिग्दर्शक अविनाश अरुण सोबत विवाह केला. तिला एक मुलगा आहे. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून लांब आहे.

पल्लवी सुभाष


मराठी चित्रपटसृष्टीतील पल्लवी सुभाष ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही वर्षापूर्वी ईटीव्ही मराठीवरील चार दिवस सासूचे नावाची ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत पल्लवी सुभाषसोबत रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत होत्या. त्यानंतर तिने गुंतता हृदय हे या मालिकेतून काम केले. सध्या ती मालिकांपासून दूर आहे.

नीलम शिर्के: 


नीलम शिर्केने वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती यासारख्या मालिकांमधून काम केले आहे. त्यानंतर तिने काही नाटक, चित्रपटातून देखील काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून ती या क्षेत्रापासून दूर आहे. तिने लग्न केले असून तिला एक मुलगी आहे आणि ती सध्या रत्नागिरी येथे राहते आहे.

 रेश्मा नाईक :


काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची ही मालिका आली होती. ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. यात शलाका नावाचे देखील एक पात्र होते. हे पात्र रेश्मा नाईकने साकारले होते. त्यानंतर तिने एकही मालिका केली नाही. आता ती लग्न करून सुखी संसारात व्यस्त आहे.

केतकी थत्ते: 


अभिनेत्री केतकी थत्ते आभाळमाया मालिकेतून घराघरात पोहचली. त्यानंतर तिने काटकोन त्रिकोण या मालिकेत काम केले. तसेच काही नाटकात देखील तिने काम केले. तसेच ती कथ्थक नृत्यांगना आहे. मात्र, अल्पावधीतच यश मिळाल्यानंतर ती मालिका आणि चित्रपटातून गायब झाली आहे.

नेहा गद्रे :


अभिनेत्री नेहा गद्रेने मालिका आणि चित्रपटात काम केले आणि ती मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा होता. मन उधाण वाऱ्याचे, मोकळा श्वास, अजूनही चांदरात आहे या मालिकांतून ती दिसली होती. त्यानंतर तिने काही मालिकांमध्ये काम केले. २०१९ साली तिने प्रियकरासोबत लग्न केले. त्यानंतर ती मालिकांपासून दूरच आहे.

सारा श्रवण:


सारा श्रवणने झी मराठी या वाहिनीवर पिंजरा या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने लग्न केले. त्यानंतर ती आता मालिका आणि चित्रपटापासून लांब आहे.

Web Title: After coming to the limelight, these actresses disappeared from the Marathi film industry. See who they are.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.