स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:37 PM2020-05-26T13:37:32+5:302020-05-26T13:46:41+5:30

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते.

Sharad Pawar spoke on stable government, but ...; Narayan Rane speak on president rule hrb | स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

Next

मुंबई : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अडीच-तीन हजारांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. यावर राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी हे भाजपाचे नाही तर आपले वैयक्तीक मत असल्याचा खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 


नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. यावर बाळासाहेब थोरात यांनी राजकारण करू नये असे म्हटले होते. यावर थोरातांना महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे. महसूलमंत्री पद घरात मिळाले चांगले आहे. त्यांना विचारा हे सरकार पाच वर्षे टिकेला का? राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मला वाटत असल्याचे राणे म्हणाले. तसेच चला एकत्र जाऊया आणि राज्यातील हॉस्पिटल पाहुयात, असे आव्हान राणे यांनी  थोरातांना दिले. तसेच गुजरातच्या अवस्थेवर बोलण्यास नारायण राणेंनी नकार दिला. 


संजय राऊत हे बेताल बोलतात. त्यांना काय केंद्र सरकारने सल्लागार ठेवलाय का, असा प्रश्न राणे यांनी विचारला. केंद्र सरकार सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रपती राजवटीला एवढे घाबरता कशाला असा सवाल राणे यांनी विचारला. तसेच शरद पवार यांनी यावर राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे सांगितल्यावर लक्ष वेधले असता राणे यांनी खोचक उत्तर दिले. 


महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामस्थाला विचारा राज्य सरकारची वस्तुस्थिती काय आहे ती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पटत नाही. शरद पवार बोलले आहेत पण हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. पवार जे स्थिर सरकारचे बोलले ते मला मान्य नाही. पवार सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा तर ठेवा, पण हे सरकार राहणार की जाणार ते लवकरच कळेल. ऑपरेशन लोटस सुरु नाही, पण हे सरकार आपोआपच जाणार. राऊतांकडे १८० नाहीत २०० आमदार आहेत. ते खिशातच घेऊन फिरतात, असा टोला त्यांनी लगावला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

 

Read in English

Web Title: Sharad Pawar spoke on stable government, but ...; Narayan Rane speak on president rule hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.