भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 06:02 PM2021-06-14T18:02:35+5:302021-06-14T18:02:55+5:30

भिवंडी पालिका क्षेत्रातील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही.

pits fell at the beginning of the Rajiv Gandhi flyover in Bhiwandi | भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

Next

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडी पालिका क्षेत्रातील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही. २००६ मध्ये सुरू झालेला हा उड्डाणपूल सुरुवातीपासून कमकुवत असून मागील तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी हा उड्डाणपूल बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले. परंतु, अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसताना या उड्डाणपुलाच्या प्रारंभी पडलेले खड्डे हे वाहनांसाठी जीवघेणे ठरत आहेत. 

उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेले खड्डे हे बरोबर चारचाकी हलक्या वाहनांच्या चाकाखाली येत असल्याने त्यांना या ठिकाणाहून वाहन चालवणे मोठ्या जिकरीचे ठरत आहे. त्यातच मागील तीन ते चार दिवस पडलेल्या पावसात या रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अशा परिस्थितीत या उड्डाणपुलाकडे व येथुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडे भिवंडी पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष करीत असून, येथे तात्पुरती डागडुजी करण्यासाठी ही प्रयत्न करीत नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 

Web Title: pits fell at the beginning of the Rajiv Gandhi flyover in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.