हर्षवर्धन पाटलांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:27 PM2019-09-05T15:27:57+5:302019-09-05T15:29:03+5:30

२०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत होते.

NCP leaders silence after Harshvardhan Patil's statement | हर्षवर्धन पाटलांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन !

हर्षवर्धन पाटलांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन !

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदारपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या वाटेवर असल्याचा इशारा दिला आहे. परंतु, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी संदर्भात अनेक गौप्यस्फोट केले. परंतु त्यावर राष्ट्रवादीकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु, आपण राष्ट्रवादीला शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितले होते. तर शरद पवारांनी इंदापूरविषयी निश्चित राहा असंही सांगितले होते. मात्र आता त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण आपली भूमिका १० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. इंदापूरची जागा सोडायची होती, तर मग शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये का आणली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी तब्बल साडेचार वर्षांनी अजित पवार यांचा आपल्याला फोन आला होता, असा खुलासा करताना वाघ म्हटलं तरी चावत आणि वाघोबा म्हटल चावतं, असा टोलाही पाटील यांनी लगावला होता. पाटील यांच्या फटकेबाजीमुळे राष्ट्रवादीचं एकांगी राजकारण समोर आले आहे.

या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षीत होते. परंतु, अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांने यावर प्रतिक्रिया दिली नाही. २०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत होते. परंतु, राष्ट्रवादी आग्रही असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आक्रमक आहेत. तसेच पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केली होती. त्या मदतीची राष्ट्रवादीकडून परतफेड होईल अशी अपेक्षा पाटील यांना होती.

 

Web Title: NCP leaders silence after Harshvardhan Patil's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.