'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:34 AM2020-01-29T11:34:20+5:302020-01-29T11:45:20+5:30

केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही.

Congress leader Balasaheb Thorat criticizes BJP | 'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'

'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'

googlenewsNext

मुंबई : एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र जर राज्याकडून संविधानाचा अवमान करणे, केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल. तसेच केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त केले जाऊ शकते असा इशाराच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकाराला दिला होता. तर याच मुद्यावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुनगंटीवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

थोरात म्हणाले की, "सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सरकारचे कामकाज राज्यघटनेनुसार चालते. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही. कोणी तशी समजूत करून घेऊ नये. कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही. असे म्हणत थोरात यांनी भाजपला खोचक टोला लगावला.

केंद्रातल्या कायद्याच्या तरतुदीबाहेर जाऊन कोणतं राज्य कृत्य करत असेल तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनी ९७ राज्यं बरखास्त केली होती. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या कायद्यात बदल केला. त्यामुळे सहजासहजी राज्य बरखास्त होऊ शकत नाही मात्र विरोधी कृत्याला पांघरुन घालणे, राज्य सरकार म्हणून त्यात सहभाग घेणे तर यातून गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असे मुनगंटीवार म्हणाले होते.

Web Title: Congress leader Balasaheb Thorat criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.