ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:46 PM2021-03-04T16:46:27+5:302021-03-04T16:48:50+5:30

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021 | ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

Next
ठळक मुद्देराम कदम यांची शिवसेनेवर जोरदार टीकातर, पश्चिम बंगालमध्ये डिपॉझिट वाचवता आलं नसतं - राम कदमशिवसेनेचा पश्चिम बंगालमधील निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021)

बिहारमध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून माहिती दिली. यामध्ये शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. ''ज्यांना श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांनाच शिवसेना पाठिंबा देत आहे'', अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

बिहारमध्ये डिपॉझिटही वाचवता आले नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, अशी विचारणा राम कदम यांनी यावेळी केली आहे. बिहारमधील निवडणुकांमध्ये एकाही जागेचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. त्यातून धडा घेत शिवसेनेने बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला, असा चिमटा राम कदम यांनी काढला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तरी तेथेही डिपॉझिट वाचवू शकले नसते, असा टोला राम कदम यांनी लगावला. 

काय म्हणाले संजय राऊत?

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.