शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': मंदिर 'देवस्थान'पासून वेगळे होणार का ? कशी असेल प्राधिकरणाची रचना 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 20, 2025 15:46 IST

योग्य पुनर्वसनाची ग्रामस्थांची अपेक्षा

इंदुमती गणेशकोल्हापूर : जोतिबा मंदिर विकास प्राधिकरण झाल्यानंतर जोतिबा मंदिर स्वतंत्र होणार का, येथे स्वतंत्र समिती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार का, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिरावर अधिपत्य असणार की नाही, पूजेसंबंधीच्या गुरवांच्या हक्कांना बाधा येणार का, असे अनेक प्रश्न प्राधिकरणच्या निमित्ताने तयार झाले आहेत. जोतिबा मंदिर हे बहुजनांचे दैवत आहे, अठरा पगड जातीचे भाविक आमच्याकडे शिधा देतात, नैवेद्य पाेटभर खाऊन तृप्त मनाने जातात. यावर आमचा उदरनिर्वाह आहे. विकासाला विरोध नाही, फक्त परंपरा, धार्मिक विधी, कुलाचाराला आणि व्यवसायाला बाधा येऊ नये, योग्य पुनर्वसन व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थांची संख्या ५ ते ६ हजारांच्या आसपास आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने आता तिथे प्रशासक आहेत. डोंगरावर ८० टक्के लोक पुजारी आहेत. त्यांच्याकडे विविध भागातून भाविक शिधा घेऊन येतात. पुजाऱ्यांनी केलेला नैवेद्य देवाला दाखवतात, जेऊन आपल्या गावी परततात. हे पौरोहित्य आणि भाविकांना सोयी-सुविधा, पूजेच्या साहित्यांची विक्री हाच येथील गुरव समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. प्राधिकरण झाल्यानंतर आमच्या या हक्कांवर बाधा येणार नाही ना, या ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय आहे.

एकत्र बैठक घ्यातिरुपतीप्रमाणे या मंदिराचेही व्यावसायिकीकरण झाले तर काय? मूळ स्थानिकांनाच बाहेर काढून उपऱ्यांना व्यवसायाची परवानगी दिली गेली, तर आम्ही कुठे जायचे, काय खायचे. कोणता व्यवसाय करायचा अशा अनेक शंका ग्रामस्थांमध्ये आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची एकत्र बैठक घेऊन त्यांच्यासमोर जोतिबा आराखडा सादर करावा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, शंकांचे निराकरण करावे, त्यांनी सुचवलेले संयुक्तिक बदल करून आराखडा पुढे राबवता येईल.

मंदिर स्वतंत्र करून अध्यक्षपद एकास देण्याची चर्चा राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांना पदे देऊन मुरवायचे कुठे, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. जोतिबा प्राधिकरण झाले की, अध्यक्षांपासून पदाधिकारी, सदस्यांची समितीच स्वतंत्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे त्याचे अधिकार असणार नाहीत. जोतिबा मंदिर स्वतंत्र करून त्याचे अध्यक्षपद एका पक्षाला द्यायचे अशाही चर्चा सुरू असल्याचे समजते. प्राधिकरणचे कामकाज स्वतंत्रपणे चालेल.

वनखात्याचे उत्तम कामया भागात वनखात्याने उत्तम काम केले असून वृक्षसंपदा वाढली आहे. माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या ३ कोटी निधीतून कल्पवृक्ष तलावाचे संवर्धन झाले आहे. पण, डोंगरावरील अन्य ७ तलावांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यांचे संवर्धन झालेले नाही.

विकासाला विरोध नाही. पण, जोतिबावरील ८० टक्के ग्रामस्थ मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिराचा विकास व्हावा, पण परंपरा खंडित होऊ नये. स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांना विश्वासात घेऊन आराखडा राबवला गेला, तर सर्वांचे सहकार्यच असेल. पण, विकासाच्या नावाखाली व्यावसायिकरण आणि स्थानिकांनाच बेरोजगार करू नये.  - नवनाथ लादे, जोतिबा हक्कदार समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा