शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

आबा असते तर ‘म्हैसाळ’चे पाणी आले असते

By admin | Updated: May 7, 2015 00:34 IST

दुष्काळी भागातून प्रतिक्रिया : कवठेमहांकाळ तालुक्यात ससेहोलपट

हणमंत देसाई -रांजणी -आज आबा असते, तर म्हैसाळ योजनेचे पाणी आम्हाला मिळाले असते, असे उद्गार कवठेमहांकाळ तालुक्यातील नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड एस येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी या भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे पाणी देऊन हा भाग सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न पाहिले होते. शेवटच्या क्षणापर्यंत या भागातील म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज योजनेचे काम पूर्ण झाले, पण पाणी सोडण्यासाठी लागणारी शासकीय व प्रशासकीय ताकद कमी पडू लागल्याचे दिसत आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे रांजणी, लोणारवाडी, अग्रण धुळगाव, पिंपळवाडी, अलकूड (एस) या पाच गावांतील जवळपास सोळाशे हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी आमदार पाटील यांनी, या भागाचा हा शेवटचाच दुष्काळ, असे सांगितले होते. म्हैसाळ योजनेची कामे ज्या गतीने सुरू होती, ते पाहिल्यानंतर येथील शेतकऱ्यांसह जनतेलाही या पाण्याची मोठी आशा निर्माण झाली होती. अस्मानी व सुलतानी संकटात येथील शेती व शेतकरी सापडला आहे. ‘राजाने छळलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कोणाकडे मागायची?’ या म्हणीप्रमाणे येथील जनतेची अवस्था झाली आहे. निसर्गाची साथ नाही आणि योजना पूर्ण झाली, पण पाणी सोडण्याची राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाही. नांगोळा तलावातून या गावांना पिण्याचे पाणी येते. पण जादा उपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.