शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

आबा असते तर ‘म्हैसाळ’चे पाणी आले असते

By admin | Updated: May 7, 2015 00:34 IST

दुष्काळी भागातून प्रतिक्रिया : कवठेमहांकाळ तालुक्यात ससेहोलपट

हणमंत देसाई -रांजणी -आज आबा असते, तर म्हैसाळ योजनेचे पाणी आम्हाला मिळाले असते, असे उद्गार कवठेमहांकाळ तालुक्यातील नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड एस येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी या भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे पाणी देऊन हा भाग सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न पाहिले होते. शेवटच्या क्षणापर्यंत या भागातील म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज योजनेचे काम पूर्ण झाले, पण पाणी सोडण्यासाठी लागणारी शासकीय व प्रशासकीय ताकद कमी पडू लागल्याचे दिसत आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे रांजणी, लोणारवाडी, अग्रण धुळगाव, पिंपळवाडी, अलकूड (एस) या पाच गावांतील जवळपास सोळाशे हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी आमदार पाटील यांनी, या भागाचा हा शेवटचाच दुष्काळ, असे सांगितले होते. म्हैसाळ योजनेची कामे ज्या गतीने सुरू होती, ते पाहिल्यानंतर येथील शेतकऱ्यांसह जनतेलाही या पाण्याची मोठी आशा निर्माण झाली होती. अस्मानी व सुलतानी संकटात येथील शेती व शेतकरी सापडला आहे. ‘राजाने छळलं आणि पावसाने झोडपलं तर दाद कोणाकडे मागायची?’ या म्हणीप्रमाणे येथील जनतेची अवस्था झाली आहे. निसर्गाची साथ नाही आणि योजना पूर्ण झाली, पण पाणी सोडण्याची राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाही. नांगोळा तलावातून या गावांना पिण्याचे पाणी येते. पण जादा उपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.