तलवार हल्लाप्रकरणी आणखी पाचजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:04 PM2020-09-16T14:04:45+5:302020-09-16T14:10:03+5:30

संभाजीनगर स्टॅन्डजवळील विजयनगर येथे तरुणावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांना अटक केली. आतापर्यंत सातजणांना अटक झाली. उदय रामचंद्र मुळीक (वय ४३), अनिल बाबूराव जाधव (३२), रवी अशोक जरग (३१), धीरज सुरेश सूर्यवंशी (२२), प्रदीप सरवदे (३८) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

Five more arrested in sword attack case | तलवार हल्लाप्रकरणी आणखी पाचजणांना अटक

तलवार हल्लाप्रकरणी आणखी पाचजणांना अटक

Next
ठळक मुद्देतलवार हल्लाप्रकरणी आणखी पाचजणांना अटकआतापर्यंत सातजणांना अटक

कोल्हापूर : संभाजीनगर स्टॅन्डजवळील विजयनगर येथे तरुणावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांना अटक केली. आतापर्यंत सातजणांना अटक झाली. उदय रामचंद्र मुळीक (वय ४३), अनिल बाबूराव जाधव (३२), रवी अशोक जरग (३१), धीरज सुरेश सूर्यवंशी (२२), प्रदीप सरवदे (३८) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, वर्चस्ववादातून संभाजीनगर स्टॅन्ड येथील विजयनगरात रविवारी रात्री अमित ऊर्फ सोन्या पाटील (रा. जुना वाशी नाका) याच्यावर तरुणांच्या गटाने हल्ला केला. यात तलवार व सशस्त्र हत्यारांचा वापर करण्यात आला होता. त्यात अमित हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल झाला. पूर्ववैमनस्यातून अमित याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुना राजवाडा पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

सोमवारी रात्री या प्रकरणातील संशयित स्वप्निल पाथरवट व राजू जरग या दोघांना अटक केली होती. पोलिसांनी मंगळवारी संशयित उदय मुळीक, अनिल जाधव, रवी जरग, धीरज सूर्यवंशी व प्रदीप सरवदे या पाचजणांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाने केली.
 

Web Title: Five more arrested in sword attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.