शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
4
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
5
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
6
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
7
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
8
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
9
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
10
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
11
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
12
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
13
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
14
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
15
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
16
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
17
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
18
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
19
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
20
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पुरोगामी चळवळींना डॉ. बाबा आढाव यांचे कायमच होते बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:41 IST

कार्याचे मोठेपण : राजर्षी शाहू पुरस्काराने १९८९ ला सन्मानित

कोल्हापूर : विविध सामाजिक चळवळींचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांचे वेळोवेळी कोल्हापुरातील पुरोगामी चळवळींना बळ मिळाले. विशेषत: देवदासी, धरणग्रस्त आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा कोल्हापुरातील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मानाच्या राजर्षी शाहू पुरस्कारानेही त्यांना १९८९ ला कोल्हापूरकरांनी सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील जुन्या सहका-यांनी आठवणींना उजाळा दिला.हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, बांधकाम मजूर अशा कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी काम करण्यासह एक गाव एक पाणवठा मोहीम राबविणारे डॉ. आढाव कोल्हापुरातील सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय होते. तत्कालीन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, श्रीपतराव शिंदे, गोविंद पानसरे यांच्यासोबत त्यांनी पुरोगामी चळवळींमध्ये काम केले. गडहिंग्लज येथील देवदासी निर्मूलन चळवळीत त्यांचे विशेष योगदान होते.अंधश्रद्धा निर्मूलन, जटा निर्मूलन उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. याशिवाय धरणग्रस्त, जंगलग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार होता. सामाजिक संस्था आणि पुरोगामी चळवळींच्या निमित्ताने त्यांची अनेक व्याख्याने कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज परिसरात झाली.त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने त्यांना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केले होते. कोल्हापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, व्यंकाप्पा भोसले, अरुण सोनाळकर, अनंत आजगावकर, शिवाजीराव परुळेकर, टी. एस. पाटील, दलितमित्र बापूसाहेब कांबळे, प्रा. विठ्ठल बन्ने अशा अनेकांनी त्यांच्यासोबत काम केले.वर्षभरापूर्वीच कोल्हापूरला फेरीअलीकडे वाढत्या वयामुळे त्याचे कोल्हापूरला येणे कमी झाले होते. गेल्या वर्षीच ते जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याच्या निमित्ताने कोल्हापूरला येऊन गेले. त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर यांच्यासह इतरांना भेटून ते गेले होते. शिप्पूरकर यांनी त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. बाबांसारख्या लढाऊ माणसांची समाजाला आज जास्त गरज असताना त्यांनी निघून जाणे हे समाजाचे नुकसान करणारे आहे अशा भावना शिपूरकर यांनी व्यक्त केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Baba Adhav: Pillar of Progressive Movements in Kolhapur

Web Summary : Dr. Baba Adhav, champion of the downtrodden, consistently supported Kolhapur's progressive movements, advocating for Devadasis, the displaced, and nomadic tribes. Honored in 1989, his work with activists like N.D. Patil leaves a void. His guidance will be missed.