शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकासच्या आमदारांचा जि.प.ला बदनाम करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेचा कोविडच्या बंधनांमुळे काही निधी अखर्चित राहिला आहे; मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषदेचा कोविडच्या बंधनांमुळे काही निधी अखर्चित राहिला आहे; मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ही रक्कम कमी आहे; मात्र तरीही महाविकास आघाडीच्या आमदारांकडून जिल्हा नियोजनच्या बैठकीत जिल्हा परिषदेला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी म्हटले आहे. आमदारांनी जि. प. निधीत हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषदेच्या २१ कोटी निधी अखर्चित राहिल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गाजला. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील, यांच्यासह आमदारांनी जि. प. च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र, ३०५४ व ५०५४ या हेड अंतर्गत असलेला निधी हा ग्रामीण विकासासाठी असल्याने शिवाय ग्रामीण जनतेची नाळ ही जि. प.शी जोडलेली असल्याने या निधीत आमदारांनी हस्तक्षेप न केलेला बरा. निधी अखर्चित का राहिला या मागची कारणे बघावी. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तिपटीने अखर्चित निधीची रक्कम कमी झाली आहे. त्यातही कोविडच्या काळात चार ते पाच महिने वर्कऑर्डर न देण्याचा शासन निर्णय होता. असे असताना यातील ९५ टक्के कामे ही टेंडरिंगमध्ये आहे. असे असतानाही आमदारांकडून जि. प. नाहक बदनाम होत आहे, असे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असल्याने महाविकासकडून मुद्दामहून असा प्रकार केला जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

आढावा बैठकीला अध्यक्षांना डावलले

जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीला जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांना निमंत्रण नव्हते. मुळात जि.प.चे ३७ सदस्य हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असताना शिवाय जि.प.चा यात वाटा मोठा असताना अध्यक्षांनाच आढावा बैठकीला न बोलाविणे हे चुकीचे असल्याचेही लालचंद पाटील यांनी सांगितले.