शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे एकाच दिवशी पाच पोलिसांवर कारवाई, तीन निलंबित तर दोघं मुख्यालयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:41 IST

पोलीस अधीक्षकांची कारवाई 

जळगाव : पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी जिल्ह्यातील पाच पोलिसांवर कारवाई केली. त्यात बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे व मुख्यालयातील कुणाल सोनवणे यांना निलंबित तर शनी पेठचे अनिल धांडे व रवींद्र गुरचळ या दोघांना मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे या दोघांनी भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष नईम पठाण यांचा मुलगा जुबेर खान पठाण याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी रविवारी दोन्ही पोलिसांविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती.मुख्यालयातील कुणाल विठ्ठल सोनवणे याने मित्रांसह नांदुरा येथे तरुणाला रिव्हॉल्वर लावून मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल यालाही अटक करण्यात आली होती. कुणाला हा देखील भुसावळचाच रहिवाशी असून मुख्यालयात नियुक्तीला आहे. नांदुरा पोलिसांनी तसेच मुख्यालयाच्या निरीक्षकांनी कुणाल याचा कसुरी अहवाल पाठविला होता. दरम्यान, अवैध धंदे सुरु ठेवणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नीलाभ रोहन यांनी उपविभागातील काही अधिकाऱ्यांना नोटीसाही बजावल्या आहेत, मात्र तरीही सुधारणा न झाल्याने या अधिकाºयांचीच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.शनी पेठच्या दोघांना अवैध धंदे भोवलेशनी पेठ पोलीस स्टेशनचे अनिल विश्वनाथ धांडे व रवींद्र एकनाथ गुरचळ या दोघांना अवैध धंदे भोवले आहेत. वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे सुरु ठेवण्यास धंदे चालकांना पाठबळ दिले म्हणून सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी दोघांचा कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्यावर डॉ.उगले यांनी सोमवारी दोन्ही कर्मचाºयांची मुख्यालयात बदली केली. दरम्यान, अवैध धंद्यामुळे कर्मचाºयांवर कारवाई झाल्याने अन्य पोलिसांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारीही रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव