दहा प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:28 AM2020-03-16T00:28:51+5:302020-03-16T00:29:30+5:30

जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे.

Ten project dryers | दहा प्रकल्प कोरडेठाक

दहा प्रकल्प कोरडेठाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील ६४ पैकी दहा प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे. उर्वरित ३७ प्रकल्पात केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पाहता जालना, भोकरदन तालुक्याचा काही भाग वगळता इतरत्र मात्र मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला होता. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६४ प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्पांमध्ये ४२.२९ दलघमी म्हणजे २७.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पांपैकी १० प्रकल्प कोरडेठाक पडले असून, १७ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे. हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. १७ प्रकल्पात केवळ २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. १० प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान, ९ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान तर केवळ एका प्रकल्पात ७६ टक्क्याच्या वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, इतर बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

Web Title: Ten project dryers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.