शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अखेर जीवरेखा धरणातून पाणी सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून अखेर रविवारी सायंकाळी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्याच्या गेटचा रॉड तुटल्याने ...

टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून अखेर रविवारी सायंकाळी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्याच्या गेटचा रॉड तुटल्याने धरणातून पाणी सुटणार की नाही, याबाबत शेेतकऱ्यांत साशंकता निर्माण झाली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून, ते सोमवारी टेंभुर्णीपर्यंत पोहोचले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले असून, आता रबी हंगामाच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावर्षी जीवरेखा धरण तुडुंब भरल्याने परिसरातील अकोलादेव, टेंभुर्णी, गणेशपूर, सावंगी, पापळ, गोंधनखेडा आदी शिवारातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम या पाण्यावर अवलंबून होता. मात्र, पहिले पाणी सुटल्यानंतर दुसरे पाणी सोडताना गेट नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभाग चिंतित होता. याबाबत टेंभुर्णी येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी सोडले नाही तर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, पाटबंधारे विभागाने तातडीने या गेटची दुरुस्ती करून रबी हंगामासाठी दुसऱ्यांदा पाणी उपलब्ध करून दिले.

धरणाचे पाणी सुटले नसते तर कालवा परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा रबी हंगाम धोक्यात आला होता. पाटबंधारे विभागाने तातडीने गेटची दुरुस्ती केल्याने टेंभुर्णी येथील शेतकरी सर्जेराव शिंदे, रंगनाथ जमधडे, विष्णू जमधडे, दत्तू मुनेमाणिक, संतोष शिंदे, संजय सावंत, शंकर खोत, रामू मुळे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

चौकट

लोकमतने आवाज उठविला

कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्यानंतर सर्वप्रथम हे वृत्त प्रकाशित करून लोकमतने शेतकऱ्यांच्या भावना संबंधित विभागापर्यंत पोहोचविल्या. शिवाय ‘धरणातील पाण्याअभावी रबी हंगाम धोक्यात’ हे वृत्त ही वारंवार प्रकाशित केले. लोकमतमुळेच आम्हा शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला. या पाण्याचा रबी हंगामासाठी मोठा फायदा होणार आहे.

संतोष शिंदे, शेतकरी, टेंभुर्णी.

फोटो

जीवरेखा धरणातील कालव्यातून टेंभुर्णीकडे झेपावलेल्या पाण्याचे अकोलादेवजवळ टिपलेले छायाचित्र.