अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 03:35 AM2018-10-27T03:35:57+5:302018-10-27T03:35:59+5:30

गतविजेत्या भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शनिवारी जपानविरुद्ध लढत द्यायची आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक देण्याच्या निर्धाराने संघ खेळेल.

 India's determination to reach the final | अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा निर्धार

अंतिम फेरी गाठण्याचा भारताचा निर्धार

googlenewsNext

मस्कत : गतविजेत्या भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शनिवारी जपानविरुद्ध लढत द्यायची आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक देण्याच्या निर्धाराने संघ खेळेल.
राऊंड रॉबिन सामन्यात जपानवर ९-० ने एकतर्फी विजयाची नोंद करणाऱ्या भारताचे पारडे जड वाटते. राऊंड रॉबिन फेरीत एकही सामना न गमविणारा भारत एकमेव संघ आहे. मलेशियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी हा एकमेव अपवाद वगळता सर्वच सामने जिंकले होते. भारत पाच सामन्यातून १३ गुण मिळवित अव्वल स्थानी आहे.

Web Title:  India's determination to reach the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.