धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 05:00 AM2021-09-17T05:00:00+5:302021-09-17T05:00:07+5:30

गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो.

You went to see the waterfall, friend! But, be careful! | धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून जा!

धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून जा!

googlenewsNext

विजय मानकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत असून, या पावसामुळे सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहून लागले आहेत. तसेच अनेक नदी-नाल्यांना पूरसुद्धा आला आहे. त्यावर रानावनात, दगडांतून झरे व धबधबेसुद्धा पाण्यातून कर्णमधुर संगीत निर्माण करीत आहेत. सालेकसा तालुक्याचा सुप्रसिद्ध हाजराफाॅल धबधबा लोकांना भुरळ घालत आहे. युवक-युवती हाजराफाॅल धबधब्याचा आनंद घ्यायला येऊ लागले आहेत. 
गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो. म्हणून पुराच्या पाण्यापासून पुरेशा अंतरावर राहून पाहणे हितकारक ठरेल. सालेकसा तालुक्यातील हाजराफाॅल धबधबा, देवरी तालुक्याचा ढासगड धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. परंतु पाण्याचे आकर्षण वाढताच लोक जवळ जाऊन वेगाने पडणाऱ्या किंवा वाहणाऱ्या पाण्यासोबत खेळू लागतात, अशात तोल जाऊन धोका निर्माण होताे. देवरी सालेकसा तालुक्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसरार धरण, तिरोडा तालुक्यातील खरबंदा, बोदलकसा जलाशय किंवा जिल्ह्यातील इतर छोटी-मोठी जलाशये तुडुंब भरलेली असून काही जलाशयांतून पाण्याचा विसर्गसुद्धा होत आहे. अशा ठिकाणी तरुण-तरुणी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु सेल्फीच्या नादात तोल जाऊन धोका होतो. नवेगावबांध येथील जलाशयात लोक नौकाविहार करण्याचा हेतूने येतात. परंतु पावसाळ्यात नौकाविहार करणे खूपच जास्त धोक्याचे असते. बोट उलटून लोक बुडत असल्याचा सतत घटना घडत आहेत. तरीसुद्धा लोक दक्षता बाळगताना दिसत नाहीत. 

आतापर्यंत अनेकांचे बळी
- मागील सहा सात वर्षात हाजराफाॅलमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीची देखरेख वाढली असून येथील नवयुवक ठिकठिकाणी नजर ठेवून असतात. त्यामुळे येथे अपघात कमी झाले. परंतु त्या आधी दोन दशकात अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले. तेही पहाडीवरुन तलावात पडून बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पाण्याशी खेळ नकोच !
- पावसाळ्यात जलाशयात खूप वाहत पाणी असून अशात बोटीवर फिरत असताना काही जण बोटीच्या एकाच बाजूवर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. अशात बरेचदा नाव उलटत असते. काहींना बोटीवर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोठा नाद असतो, परंतु हा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून बोटीवर सेल्फी आणि पाण्याशी खेळ नकोच.

धोका पत्करू नका 
- पर्यटकांनी पहाडावर किंवा मोठ्या दगडावर चढूृ नये, शिवाय पहाडावरुन सतत पाणी पाझरत असून चढता उतरता मोठा धोकादायक असते. काही लोक झाडाच्या फांद्या पकडून वर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु पावसाळ्यात झाडाचे बुड कमजोर झालेले असतात तसेच फांद्यावरुन हात घसरतो आणि अपघात झाल्यास खाली पाण्यात पडण्याची भीती असते. 

मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असून नदी नाल्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हाजराफाॅलला पाण्याची पातळी वाढली असून तलावात सुध्दा पाणी वाढले असून प्रवाहाचा वेग सुध्दा वाढला आहे. अशात पर्यटकांनी सेल्फी काढण्यासाठी जवळ जाऊ नये तसेच पहाडावर अजिबात चढू नये. 
-अभिजित इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी सालेकसा.

 

Web Title: You went to see the waterfall, friend! But, be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन