शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

८ हजार बौद्ध बांधवांना रमाईचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:41 IST

बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२४८१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता : घरकुल अधिक मागणी कमी

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी रमाई आवास योजनेच्या घरांची संख्या मोठी आहे. परंतु घर मागणी करणाºयांची संख्या कमी असल्याची माहिती पुढे आली आहे.रमाई आवास योजनेतून पक्के घर देण्यासाठी सन २०१७-१८ या वर्षात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली. त्यातील २ हजार ८८४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यातील २ हजार ४८१ लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. ५ हजार घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. गोंदिया तालुक्यासाठी १११९ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ४६७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. गोरेगाव तालुक्यासाठी ५१५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ३६८ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी ७९६ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ५५६ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यासाठी ५९३ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ४७७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.देवरी तालुक्यातील ८३० घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.४०१ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. तिरोडा तालुक्यासाठी ५६५ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.२५३ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. आमगाव तालुक्यासाठी ३६१ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १५८ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.सालेकसा तालुक्यासाठी २२१ घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १७७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत. एकूण जिल्ह्यासाठी ५ हजार घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. २ हजार ८५७ घरकुलाच्या नस्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजूर केल्या आहेत.