शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

गोंदिया : मागील तीन-चार वर्षांपासून गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण ...

गोंदिया : मागील तीन-चार वर्षांपासून गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण मुलांचा छळ करायचा. यामुळे त्याचा खून त्याच्या प्रेयसीच्या मुलांनीच केल्याची घटना १० मे च्या दुपारी २.३० वाजता मूरपार येथील शेतातील झोपडीत घडली.

जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे (वय ४५, रा. मूरपार) असे मृताचे नाव आहे. मृतक जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे याचे मागील तीन-चार वर्षांपासून गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधापोटी त्याने तिला नागपूरला पळवून नेले. तिच्यासोबत त्याने नागपुरात दोन वर्षे काढली. मागील एक वर्षापासून तो मूरपार येथे परतल्यावर गावापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेत शिवारात झोपडी करून राहत होता, तर त्या महिलेचा पती व मुले आपल्या घरी राहत होते. परंतु मृत जयप्रकाश लिल्हारे याने ज्या महिलेला पळवून नेले होते, तिच्या मुलांना तुझ्या आईला मी पळविले, परंतु तुम्ही काहीच करू शकले नाही म्हणून त्यांचा छळ करायचा. याचा वचपा म्हणून आरोपी कोमल रामचंद्र रणगिरे (३३) व रूपेश रामचंद्र रणगिरे (१९, दोन्ही रा. मुरपार) या भावंडांनी चाकूने मारून त्याचा खून केला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.

बॉक्स

विम्याच्या ३.५० लाखांचाही होता वाद

आरोपी कोमल रणगिरे याच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या नावाने असलेल्या विम्याच्या पाॅलिसीवर नॉमिनी म्हणून पळून गेलेल्या महिलेचे नाव होते. पॉलिसी सुरूच असताना नॉमिनीचे नाव बदललेले नव्हते. रमचंद्र रणगिरे यांच्या नावाने असलेल्या तीन लाख ५० हजार रुपये विम्याचे पैसे पळून गेलेल्या आपल्या आईला मिळू नये म्हणून आरोपी मुलांचा प्रयत्न होता. हा देखील वाद त्यांच्यात सुरू असल्याची माहिती आहे. या दिशेने देखील रावणवाडी पोलीस तपास करीत आहेत.