ग्रामीण भागात मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी -जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:00 AM2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:32+5:30

भारत नेट प्रकल्पांतर्गत मागील दाेन वर्षांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे.

In rural areas, he will get internet connection - Collector | ग्रामीण भागात मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी -जिल्हाधिकारी

ग्रामीण भागात मागेल त्याला मिळणार इंटरनेट जाेडणी -जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देठाणेगाव भारत नेट प्रकल्पाच्या पाहणीनंतर दिली ग्वाही

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या सहा तालुक्यांतील गावांमध्ये इंटरनेट केबल पाेहाेचली आहे. त्या गावातील गरजू लाेकांना इंटरनेटची जाेडणी माफक दरात उपलब्ध हाेईल. तसेच गावातील मुख्य ठिकाणी वायफाय सेवा माेफत दरात उपलब्ध हाेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. 
भारत नेट प्रकल्पांतर्गत मागील दाेन वर्षांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रामपातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतपर्यंतची मुख्य जोडणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. आता ग्रामपंचायतीमधून गावातील प्रत्येकी पाच शासकीय कार्यालयांना इंटरनेट जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या जोडणीमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून सीएससीला देण्यात आले होते.  त्याअंतर्गत झालेल्या कामाचे अवलोकन करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे भेट दिली, तसेच आरमोरी तालुक्यात इंटरनेट जोडणीकरिता सीएससी वाय-फाय चौपाल कार्यक्रमांतर्गत सीएससी केंद्र संचालक पराग हजारे यांच्या केंद्रात प्रस्थापित केलेल्या मिनी ओईलटीचीसुद्धा पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कार्यप्रगतीवर समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प  योग्यरित्या राबवून जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सीएससी जिल्हा समन्वयक शाहीद शेख यांनी दिली. याप्रसंगी  देसाईगंज उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, आरमोरी तहसीलदार कल्याण कुमार दहाट, संवर्ग विकास अधिकारी चेतन शिवांश, महा आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयंत मुकुंदवार, बीएनएलचे नेटवर्क इंजिनिअर समीर शेख, जिल्हा व्हीएलई सोसायटीचे अध्यक्ष नसिर हाशमी प्रामुख्याने उपस्थित होते.

इतरही तालुक्यांमध्ये भारत नेट 
कार्यक्रमाला गती देण्याचे निर्देश

सहा तालुके वगळता इतरही तालुक्यांमधील गावे इंटरनेटने जाेडण्याचे काम सुरू आहे. हा कार्यक्रम युद्धस्तरावर राबवून जोडणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जोडणीद्वारे गावातील इतर गरजू लोकांनासुद्धा माफक दरात ही जोडणी उपलब्ध करून इंटरनेटची जिल्ह्यातील एक पोकळी कमी करण्याचीसुद्धा सूचना केली. यातून जिह्यातील इंटरनेट समस्या निश्चितच सुटेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एक गावात एका ठिकाणाहून नागरिकांसाठी नाममात्र दरात वाय-फाय पुरवठा केला जाणार आहे. यातून स्थानिक नागरिकांना चांगल्याप्रकारे फायदा होऊन त्यांची कामे मार्गी लावता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

 

Web Title: In rural areas, he will get internet connection - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.