शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात मास्क लावायचा नसेल तर गैरसमज न ठेवता लस जरूर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

ना. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असे समजून गाफील राहू नका. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन केल्यास निश्चितच कोरोना हद्दपार करता येईल. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी करण्यास मदत होईल. लस टोचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देवडेट्टीवार यांचे आवाहन: नवेगावात पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लसीकरणाबाबत कोणतीही अंधश्रद्धा आणि गैरसमज न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी. मी कालच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सर्वांनी लस घेतल्यास भविष्यात आपल्याला मास्क घालायची गरज पडणार नाही, असे मार्गदर्शन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असल्यामुळे अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. गडचिरोलीलगत नवेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पाणी पुरवठा योजना व सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यासाठी ते आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.सदस्य रामभाऊ मेश्राम, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असे समजून गाफील राहू नका. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन केल्यास निश्चितच कोरोना हद्दपार करता येईल. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी करण्यास मदत होईल. लस टोचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील लसीकरण व आरोग्य सुविधांबाबत यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हयातील कोरोना स्थितीबाबतही चर्चा करून लसीकरणाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

आदिवासी बांधवांशी साधला संवादसावरगाव येथे काही घरांबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांशी ना.वडेट्टीवार यांनी गाडीतून उतरून संवाद साधला व तेथील समस्यांबाबत चर्चा केली. गावकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत अडचणी सांगितल्या. लगेच मंत्र्यांनी पाणी पुरवठा विभागाला समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी घरात जाऊन त्यांची विचारपूस केली.

दरडाेई पाणीपुरवठा वाढविण्यासाठी नियाेजन करा

जल जीवन मिशन प्रकल्पांतर्गत नवेगाव-मुरखळा ग्रामपंचायतीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ३.५ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते झाले. शहरालगत असलेली व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. भविष्यात दरडोई पाणी पुरवठा वाढविण्याची आवश्यकता पडेल. त्यासाठी आताच नियोजन करा व प्रस्ताव प्रशासनास सादर करा, आपण लोकांना आवश्यक पाणी देऊ, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcorona virusकोरोना वायरस बातम्या