अहेरी-देचलीपेठा मार्गावरील बसफेरी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:50+5:302021-01-17T04:31:50+5:30
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा गावात जाण्यासाठी अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षांपासून सुरू हाेती. परंतु ...

अहेरी-देचलीपेठा मार्गावरील बसफेरी बंदच
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा गावात जाण्यासाठी अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षांपासून सुरू हाेती. परंतु काेरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाने दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या बसफेऱ्या पूर्णपणे बंद केल्या. मध्यंतरी जिमलगट्टापासून ५ किमी अंतरावरील किष्टापूर गावालगतच्या नाल्यावरील रपटा पावसाळ्यात वाहून गेल्याने बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. मात्र आता शासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम केले आहे. या मार्गावरून कोणत्याही प्रकारची वाहने सहज जाऊ शकतात. देचलीपेठा ह्या गावातील नागरिकांना दररोज विविध कामांसाठी अहेरी तालुका मुख्यालयात जावे लागते. नागरिकांना काम आटोपून परत गावी येण्यास कोणत्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे त्यांना अहेरी तालुका मुख्यालयापासून जिमलगट्टापर्यंत यावे लागते. येथील नागरिकांना नेहमीच खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागताे. मात्र अनेक खासगी प्रवासी वाहनधारक मनमानीपणे प्रवासभाडे आकारतात. तसेच वाहनाच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर छत्री घेऊन टपावर बसून प्रवास करावा लागताे. येथील नागरिकांनी वेळोवेळी अहेरी आगार प्रमुखांची भेट घेऊन बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.परंतु आगर प्रमुखांनी देचलीपेठामार्गे बसफेरी पूर्ववत सुरू केली नाही. नागरिकांमध्ये आगार प्रशासनाविषयी राेष व्यक्त हाेत आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या साेयीसाठी देचलीपेठामार्गे बसफेरी लवकर सुरू करावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
बाॅक्स
मिळेल त्या वाहनाने प्रवास
जिमलगट्टा-देचलीपेठा परिसरात १५ ते २० गावांचा समावेश आहे. या भागातील नागरिकांनी वैयक्तिक खासगी तसेच कार्यालयीन कामाकरिता तालुका मुख्यालयात जावे लागते. परंतु नागरिकांना ये-जा करण्यासाठी काेणत्याही प्रकारचे साधन नाही. बसफेरी सुरू असताना नागरिकांना अडचणी येत नव्हत्या. परंतु बसफेरी बंद झाल्यापासून आवागमनासाठी अडचणी येत आहेत.ज्या नागरिकांकडे वाहने आहेत अशा नागरिकांना अडचणी नाहीत. परंतु ज्यांच्याकडे साधने नाहीत अशांना दुसऱ्यांकडील वाहनांचा आधार घ्यावा लागताे. मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करीत तालुका मुख्यालयात यावे लागते.