शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण आपल्या दारी उपक्रमातून शेतकर्यांच्या अडचणी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:49 IST

शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत कार्यवाही करण्याच्यास सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.

धुळे : कृषी पंपासाठी वापरले जाणारे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरित देऊन रब्बी हंगामात शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा द्यावा, मागणीनुसार तातडीने सिंगल फेज कनेक्शन सुरू करावे तर महावितरण आपल्या दारी अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत कार्यवाही करण्याच्यास सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.धुळे तालुक्यातील शेतीपंप व गावातील विजेच्या प्रश्‍नांसंदर्भात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला कार्यकारी अभियंता डी. डी. भामरे, के.एस. बेले, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.माजी सभापती बाजीराव पाटील, उपकार्यकारी अभियंता एन.बी.गांगुर्डे, योगेश चव्हाण, हेमंत अहिरे, अशोक सुडके, योगेश पाटील, आबा शिंदे, सुभाष पाटील, दशरथ पाटील, भूषण बोरसे, विवेक जाधव आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सुरळीत व अखंडत वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणकडून अडचणी सोडवाव्यात तसेच महावितरण आपल्या दारी योजना सुरू करून वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या अशा शेतकऱ्यांना वीज जोडणी करून द्यावी. तालुक्यात शेतशिवारात राहणाऱ्या अनेक ग्राहकांनी सिंगल फेज वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. तसेच कृषीपंपाचा जळालेला ट्रान्सफॉर्मर उशिरा बसविण्यात येत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. कटआऊटसाठी आमदार निधीधुळे तालुक्यात ४८०० ट्रान्सफॉर्मरची संख्या आहे. या ट्रान्सफॉर्मरवर असलेले फ्यूज (कटआऊट) फुटलेले असून आणि धोकेदायक अवस्थेत आहेत. या सर्व ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूज बदलून नवीन टाकण्यासाठी आवश्यक तो आमदार निधी देण्याचे आ. कुणाल पाटील यांनी यावेळी जाहीर केले. याबाबतचा त्वरित सर्व्हे करण्याच्याही सूचना आ.पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच काही गावातील जीर्ण विद्युत तारा बदलण्याचे आदेश यावेळी दिले.
टॅग्स :Dhuleधुळे