भाईंदरमध्ये दोन दिवसात दोन तरुणांनी केल्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 06:04 PM2019-08-26T18:04:35+5:302019-08-26T18:06:15+5:30

आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

Two young men committed suicide in two days in Bhayander | भाईंदरमध्ये दोन दिवसात दोन तरुणांनी केल्या आत्महत्या

भाईंदरमध्ये दोन दिवसात दोन तरुणांनी केल्या आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपहिला मृतदेह रविवारी भाईंदर - नायगाव दरम्यानच्या खाडीवरील रेल्वे पुलावर गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळाला आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव राजेश संतराम यादव (२१) असं आहे. भाजीविक्री करणारा असून दुकानातच तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सोमवारी आढळून आला. 

मीरारोड - भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या दोन्ही तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले असून आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

पहिला मृतदेह रविवारी भाईंदर - नायगाव दरम्यानच्या खाडीवरील रेल्वे पुलावर गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळाला. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव राजेश संतराम यादव (२१) असं आहे. त्याची ओळख पटली असली तरी त्याचे नातलग अजून आलेले नाहीत. 

तर दुसऱ्या घटनेत मिरारोडच्या रामदेव पॅराडाईसमधील एका दुकानात तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाचे नाव रविराज हरेश खाप (२४) असे आहे. भाजीविक्री करणारा असून दुकानातच तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सोमवारी आढळून आला. दोघांनी आत्महत्या केल्याचे करण अद्यापही स्पष्ट झालेले नसून नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Two young men committed suicide in two days in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.