भयंकर! पतीशी भांडण झाल्याने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; महिलेवर आठवडाभर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:34 PM2021-10-19T18:34:58+5:302021-10-19T18:36:57+5:30

Crime News : महिलेला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि आठवडाभर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Crime News patna miscreants did gang rape with married lady at patna | भयंकर! पतीशी भांडण झाल्याने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; महिलेवर आठवडाभर सामूहिक बलात्कार

भयंकर! पतीशी भांडण झाल्याने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; महिलेवर आठवडाभर सामूहिक बलात्कार

googlenewsNext

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्याने  एका महिलेने घर सोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि आठवडाभर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बिहारच्या पाटणामध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं 10 ऑक्टोबर रोजी आपल्या पतीसोबत खूप मोठं भांडण झालं. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिला रागाच्या भरात घर सोडून गेली होती. तिने कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला आणि ट्रेन पकडण्यासाठी पटणा जंक्शन गाठलं. यानंतर ती महिला एका हॉटेलमध्ये गेली, जिथे तिने हॉटेल मालकाला कोलकाताला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारले. त्यावेळी त्याने महिलेला गोड बोलून आपल्या जाळ्यात फसवलं. तसेच तिच्या राहण्याची देखील एका ठिकाणी व्यवस्था केली. ट्रेन येईपर्यंत इथेच थांबा असं महिलेला सांगण्यात आलं. 

आठवडाभर महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार 

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही तासांनंतर आरोपींनी खोलीत जाऊन तिच्यावर बलात्कार केला. आठवडाभर महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. एक आरोपी तिच्यावर नजर ठेवण्यासाठी चोवीस तास खोलीच्या बाहेर उभा राहायचा. जेव्हा पीडित महिला कोलकाताला पोहचली नाही, तेव्हा तिच्या पतीने जक्कनपूर पोलिस स्टेशनमध्ये ती हरवल्याची तक्रार दाखल केली. तिच्याकडे असलेल्या मोबाईलच्या आधारे पाटणा जंक्शन हे तिचे शेवटचे स्थान असल्याचे आढळले. या अंतर्गत शोधमोहीम सुरू करण्यात आली.

वादातून तिने घर सोडून जाण्याचा मोठा निर्णय घेतला

महिलेचं लग्न झालं असून तिला दोन लहान मुलं आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत असायचा. अशातच झालेल्या वादातून तिने घर सोडून जाण्याचा मोठा निर्णय घेतला. यानंतर तिला नराधमांनी गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी अधिक तपास केला असता. महिलेला ज्या घरात डांबून ठेवले होते तिथे पोहचत त्यांनी महिलेची सुटका केली. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Crime News patna miscreants did gang rape with married lady at patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.