विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, मंदिरात केलं लग्न; मग, अचानक उचललं खळबळजनक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:34 PM2022-01-26T20:34:48+5:302022-01-26T20:35:07+5:30

बदनामी होण्याच्या भीतीनं नीरजनं त्या विवाहित महिलेशी मंदिरात लग्न केले.

After Immoral relations with a married woman murder by Accused at Bihar | विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, मंदिरात केलं लग्न; मग, अचानक उचललं खळबळजनक पाऊल

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, मंदिरात केलं लग्न; मग, अचानक उचललं खळबळजनक पाऊल

googlenewsNext

पटना – प्रेमात चंद्रतारे तोडून आणण्याचं स्वप्न दाखवत विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. संबंधांबाबत सत्य उघड होताच त्याच महिलेसोबत मंदिरात जाऊन लग्न केले. परंतु जेव्हा ही महिला प्रेयसी ते पत्नी बनली तिने प्रियकराच्या घरी जाण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. त्यावेळी नुकताच पती बनलेल्या प्रियकरानं पत्नीसोबत जे काही केले ते ऐकून सर्वच हैराण झाले.

अनैतिक संबंध ते लग्नापर्यंत पोहचलेली ही कहानी आहे पटना जिल्ह्यातील बुढनीचक गावातील. याठिकाणी राहणाऱ्या नीरज नावाच्या युवकाचं शेजारील महिलेच्या घरात येणंजाणं होतं. ती महिला एकटीच राहायची. तिचा पती नाशिकमध्ये होते. नीरज त्या महिलेच्या घरी तासनतास वेळ घालवायचा. त्याचवेळी दोघांमधील जवळीक वाढली. दोघंही एकमेकांवर प्रेम करु लागले. एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेऊ लागले. नीरज त्याच्या विवाहित प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला होता.

दोघांमध्ये शारिरीक संबंध बनले, दोघंही नेहमी रात्र एकत्र घालवत होते. दोघांबाबत चर्चा सुरु झाल्या. बदनामी होण्याच्या भीतीनं नीरजनं त्या विवाहित महिलेशी मंदिरात लग्न केले. महिलेच्या बहिणीने सांगितले की, लग्नानंतर दोघंही एकत्र राहत होते. परंतु गेल्या मंगळवारी रात्री नीरजने त्याच्या बहिणीची गळा दाबून हत्या केली. मृतकाच्या बहिणीच्या मते, आरोपी नीरज बहिणीसोबत लिव इनमध्ये दुसऱ्या ठिकाणी राहू इच्छित होता.

नीरज त्याच्या विवाहित प्रेयसीला घरी नेण्यास तयार नव्हता. मात्र ती महिला घरी नेण्यासाठी नीरजवर सातत्याने दबाण आणू लागली. याच गोष्टीने नीरज आणि प्रेयसीत भांडणं सुरु झाली. वाद इतके विकोपाला गेले की नीरजा संताप अनावर झाला. ज्या महिलेवर नीरज जीवापाड प्रेम करायचा त्याच महिलेचा गळा आवळून मारुन टाकलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले.

मृत महिलेचे २० वर्षापूर्वी लग्न झालं होतं. परंतु तिचा पती नाशिकमध्ये राहत होता. जेव्हा त्याला पत्नी आणि नीरजच्या अनैतिक संबंधांबाबत कळालं तेव्हा त्याने पत्नीसोबत नातं तोडलं. त्यानंतर ते दोघंही वेगळे राहू लागले. मात्र नीरज आणि महिलेमधील जवळीक वाढली. या दोघांच्या लफड्याची चर्चा गावभरात झाल्यावर दोघांनी लग्न केले. मात्र अखेर नीरजनं तिलाच संपवले. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहे जो घटनेपासून फरार झाला आहे.  

Web Title: After Immoral relations with a married woman murder by Accused at Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.