शिवजयंती निमित्त ट्विट करत विरेंद्र सेहवाग म्हणाला, "इतिहास चुकीचा होता..."

Virender Sehwag Tweets On Shivjayanti : शिवजयंतीच्या निमित्ताने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 11:48 PM2021-02-19T23:48:17+5:302021-02-20T07:46:23+5:30

whatsapp join usJoin us
Tweeting on the occasion of Shiv Jayanti, Virender Sehwag said, "History was wrong ..." | शिवजयंती निमित्त ट्विट करत विरेंद्र सेहवाग म्हणाला, "इतिहास चुकीचा होता..."

शिवजयंती निमित्त ट्विट करत विरेंद्र सेहवाग म्हणाला, "इतिहास चुकीचा होता..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देविरेंद्र सेहवागच्या या ट्विटला जवळपास ७५ हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये चक्क इतिहास चुकीचा होता, असे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे. दरम्यान, विरेंद्र सेहवागचे हे ट्विट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Virender Sehwag Tweets On Shivjayanti And Said History Was Wrong )

ट्विटमध्ये विरेंद्र सेहवाग म्हणाला, "शक्तीशाली लोकं ही शक्तीशाली जागेमधूनच येतात, असे इतिहासाने आपल्याला सांगितले. मात्र, इतिहास चुकीचा होता. शक्तीशाली लोकं ही जागा शक्तीशाली बनवतात." याचबरोबर, विरेंद्र सेहवागने शिवजयंतीच्या निमित्ताने महान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत 'जय माँ भवानी', असे लिहिले आहे.

विरेंद्र सेहवागच्या या ट्विटला जवळपास ७५ हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच, अनेकांनी विरेंद्र सेहवागचे हे ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियात विरेंद्र सेहवागचे हे ट्विट चांगलेच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, विरेंद्र सेहवाग नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. तो अनेक घडामोडींवर ट्विट करत असतो आणि त्याच्या या ट्विट्सना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला आहे.

Web Title: Tweeting on the occasion of Shiv Jayanti, Virender Sehwag said, "History was wrong ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.