Rohit Sharma vs Virat Kohli, IPL 2022 : रोहित शर्माच्या विधानामुळे RCB चे चाहते नाराज; पाहा काय बोलला Mumbai Indians चा 'हिटमॅन'

रोहित नक्की असं बोलला तरी काय... वाचा सविस्तर

Rohit Sharma vs Virat Kohli : IPL 2022 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुंबईला मंगळवारी हैदराबादकडून पराभूत व्हावे लागले. आता स्पर्धेतील अवघा एक आठवडा शिल्लक असताना प्ले-ऑफसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) ची परिस्थिती फारच विचित्र झाली. ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले, पण विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे भवितव्य मुंबईच्या सामन्यावर आहे.

असे असतानाच रोहित शर्माने एक वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्यामुळे RCBचे चाहते चांगलेच नाराज झाले. मुंबई इंडियन्सने शेवटचा साखळी सामना हरला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले-ऑफमध्ये पोहोचणे कठीण होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध होणार आहे. दिल्लीविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा असं काही बोलला की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते संतापले.

"आम्हाला ही स्पर्धा विजयी नोटवर संपवायची आहे. शेवटच्या सामन्यात आम्ही काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो. त्याच्या भरवशावर आम्हाला पुढील हंगामाची तयारी सुरू करता येईल", असे रोहित शर्मा म्हणाला.

जर रोहितचा मुंबई संघ दिल्लीविरोधात पराभूत झाला तर बंगलोरसाठी प्ले-ऑफचे तिकीट मिळवणं अधिक सोपं होईल. पण मुंबईने दिल्लीला पराभूत केले तर १४ गुणांसह दोन-तीन संघ एका स्थानासाठी झगडताना दिसू शकतील. त्यामुळे RCBचे चाहते काहीसे नाराज झाल्याचे दिसून आले.