36 All Out नंतर विराट कोहलीनं मध्यरात्री १२.३० वाजता पाठवला मॅसेज अन् असे ठरले 'मिशन मेलबर्न'! 

गॅबा कसोटीनंतर फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं यू ट्यूब चॅनेलवर श्रीधर यांच्यासोबत गप्पा मारल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: January 24, 2021 11:23 AM2021-01-24T11:23:34+5:302021-01-24T11:24:04+5:30

whatsapp join usJoin us
'Kohli messaged around 12:30 am, the night we were bowled out for 36': India fielding coach reveals 'mission Melbourne' | 36 All Out नंतर विराट कोहलीनं मध्यरात्री १२.३० वाजता पाठवला मॅसेज अन् असे ठरले 'मिशन मेलबर्न'! 

36 All Out नंतर विराट कोहलीनं मध्यरात्री १२.३० वाजता पाठवला मॅसेज अन् असे ठरले 'मिशन मेलबर्न'! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाची सुरुवातच लाजीरवाण्या पराभवानं झाली. त्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, टीम इंडियाच्या खेळाडूंनी जिद्दीच्या जोरावर मालिका वाचवलीच नाही, तर २-१ अशा फरकानं जिंकलीही...अॅडलेड कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पितृत्व रजेसाठी मायदेशात परतला, परंतु ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी विराटनं मध्यरात्री १२.३० वाजता बैठक बोलावली. टीम इंडियाच्या प्रमुख सदस्यांसोबतच्या या बैठकीत 'मिशन मेलबर्न' ठरलं. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक फलंदाज आर श्रीधऱ ( R Sridhar) यांनी याबाबत सांगितले. 

गॅबा कसोटीनंतर फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं यू ट्यूब चॅनेलवर श्रीधर यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यावेळी श्रीधर यांनी सांगितले की, अॅडलेट कसोटीतील पराभवानंतर मेलबर्न कसोटीचा प्लान ठरवण्यासाठी विराटनं १२.३० वाजता मॅसेज करून मिटींग बोलावली. तेव्हा मध्यरात्रीचे १२.३० वाजले होते आणि त्यानं विचारलं, तुम्ही काय करताय? मला धक्का बसला, विराट एवढ्या रात्री का मॅसेज करतोय, हेच कळले नाही. माझ्यासोबत रवी शास्त्री, भरत अरूण आणि विक्रम राठोड आहेत, असे मी त्याला कळवले. तेव्हा तो म्हणाला मी पण येतो.''

''तो आला आणि पुढील सामन्यांच्या रणनीतीवर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारे मिशन मेलबर्न ठरले. तेव्हा शास्त्री म्हणाले होते की, या ३६ धावांची आठवण बॅजसारखी घाला. याच ३६ धावा आपल्याला ग्रेट टीम बनवतील,''असे श्रीधर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,'' नक्की कोणते निर्णय घ्यायचे, याबाबत आम्ही थोडे संभ्रमात होतो. सकाळी विराटनं अजिंक्य रहाणेला कॉल केला आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली. ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर कोणताही संघ त्यांच्या फलंदाजांची फळी मजबूत करण्यावर भर देईल, परंतु शास्त्री, विराट आणि अजिंक्य यांनी गोलंदाजी बळकट करण्यावर भर दिला. त्यामुळेच विराटच्या जागी संघात रवींद्र जडेजाची निवड झाली आणि तोच मास्टरस्ट्रोक ठरला.''


मेलबर्न कसोटीत अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं ८ विकेट् राखून सामना जिंकला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर  सिडनी कसोटी अनिर्णीत राखली आणि गॅबावर ऐतिहासिक विजय मिळवून मालिका २-१नं जिंकली. 

Web Title: 'Kohli messaged around 12:30 am, the night we were bowled out for 36': India fielding coach reveals 'mission Melbourne'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.