IPL 2020 Final : सूर्यकुमार यादवनं संघासाठी दिली स्वतःची विकेट, कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 07:30 AM2020-11-11T07:30:00+5:302020-11-11T07:30:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Final: I should have sacrificed my wicket for Surya, with the kind of form he has been, Say Rohit Sharma | IPL 2020 Final : सूर्यकुमार यादवनं संघासाठी दिली स्वतःची विकेट, कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

IPL 2020 Final : सूर्यकुमार यादवनं संघासाठी दिली स्वतःची विकेट, कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या MIनं दुबईत झालेल्या IPL2020च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला. या कामगिरीसह मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी स्वतःच्या नावावर वेगळा विक्रम नोंदवला.

    
मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या. 

समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी'कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. रोहित शर्मानं या दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला.   रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विजयासाठीच्या आवश्यक धावा अन्य फलंदाजांनी सहज केल्या. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं. मुंबईनं १८.४ षटकांत ५ बाद १५७ धावा करून जेतेपद पक्कं केलं. इशान किशन १९ चेंडूंत ३३ धावांवर नाबाद राहिला.  
या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली. ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित व सूर्यकुमार यादव यांच्यात ताळमेळ चूकला अन् रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यानं स्वतःला रन आऊट करून घेतले. त्याबाबत रोहित शर्मा म्हणाला की,''या संपूर्ण पर्वात आमच्या बाजूनं सर्व गोष्टी घडल्या, त्याबद्दल आनंदी आहे. मी सुरुवातीलाच म्हटले होते की, विजयाची सवय लावून घ्यायला हवी. सर्व खेळाडू अविश्वसनीय आहेत आणि त्यांच्याकडून यापेक्षा अधिक काही मागूच शकत नाही. सूर्या ज्या फॉर्मात आहे, ते पाहता मला त्याच्यासाठी विकेट द्यायला हवी होती. त्याच्यासारखी फटकेबाजी या पर्वात कुणीच केली नाही.''

 

सूर्यकुमारनं 16 सामन्यांत 4 अर्धशतकांसह 480 धावा केल्या. 

Web Title: IPL 2020 Final: I should have sacrificed my wicket for Surya, with the kind of form he has been, Say Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.