ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...

India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 04:44 PM2020-03-08T16:44:46+5:302020-03-08T16:45:42+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: ICC and BCCI former president Sharad Pawar tweet after Indian women team loss svg | ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...

ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या टीम इंडियानं दडपणाखाली खेळ केला आणि त्यामुळे त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. टीम इंडियाच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. ते काय म्हणाले, हे जाणून घेऊया...

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं फटकेबाजी केली. हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह हिलीनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या. हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान आहे. मूनी ७८ धावांवर नाबार राहिली. मूनीनं ५४ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. स्पर्धेत आतापर्यंत तुफानी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला दडपणात अपयश आले. मीगन स्कटच्या चेंडूवर चिकी फटका मारण्याचा तिचा बेत चुकला आणि यष्टिरक्षक हिलीनं सुरेख झेल टिपला. त्यानंतर आलेली तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. जेमिमा रॉड्रीग्ज ( ०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( ४ ) यांनाही जेस जॉनासेननं बाद केले. स्मृती मानधनाचे अपयशाचे सत्र अंतिम सामन्यातही कायम राहिले. ती ११ धावा करून सोफी मोलिनेक्सच्या गोलंदाजीवर बाद झाली. वेदा कृष्णमुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही काळ खेळपट्टीवर खिंड लढवली. परंतु १२ व्या षटकात वेदा झेलबाद झाली. भारताची अखेरच्या आशाही मावळल्या. स्कटनं १८ व्या षटकात टीम इंडियाच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. टीम इंडिया ९९ धावांवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं ८५ धावांनी सामना जिंकला. ऑसींनी ८६ हजार १७४ प्रेक्षकांच्या साक्षींनं पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. 

भारतीय महिला संघाच्या पराभवानंतर आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले. त्यांनी लिहीलं की,''भारतीय महिला संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी अविश्वसनीय होती. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ केला आणि टीम इंडियाचे भविष्य उज्वळ आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे अभिनंदन. मोक्याच्या सामन्यात त्यांनी त्यांची कामगिरी उंचावली आणि जेतेपदाचा मान मिळवला.''

ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाचं नेमकं काय चुकलं?

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

अ‍ॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

'या' दोन मोठ्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या, अन्यथा....

ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी

Web Title: India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: ICC and BCCI former president Sharad Pawar tweet after Indian women team loss svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.